AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वच आपले काही दुश्मन नाहीत, काय म्हणाले छगन भुजबळ

छगन भुजबळ यांना राज्य सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत.त्यांनी आता कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली पुढील रणनिती जाहीर केली आहे.त्यावरुन राज्यातील नव्या सरकार समोर पुन्हा एकदा अनेक प्रश्न निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वच आपले काही दुश्मन नाहीत, काय म्हणाले छगन भुजबळ
छगन भुजबळ
| Updated on: Dec 18, 2024 | 3:46 PM
Share

राज्यातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या रविवारी नागपूर राजभवनातील हिरवळीवर पार पडला. त्यानंतर मंत्रीमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना डावलले गेल्याचे पुढे आले आहे. या डावलेले गेल्यात सर्वात मोठे नाव छगन भुजबळ यांचे होते. त्यामुळे छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त करीत नाशिक येथे कार्यकर्त्यांचे मेळावे घेणे सुरु केले आहे. आज त्यांनी नाशिकमध्ये मेळावा घेत ओबीसींचा यल्गार पुकारला आहे. आपण सर्वांना सोबत घेऊन ओबीसींचा प्रश्न मांडणार आहोत असे सांगत छगन भुडबळ यांनी नव्या सरकारला थंडीत घाम फोडला आहे.

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मंत्री होण्याच्या संभाव्य यादीत होते.त्यांना मराठा आरक्षणा दरम्यान आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या पंगा घेतला होता. त्यांच्या मराठा नेत्याला अशा प्रकारे अंगावर घेण्याने महायुतीच्या सरकारला ओबीसींची एकगट्टा मिळाल्याची आठवण भुजबळ यांनी या मेळाव्यात करुन दिली आहे. विधानसभेच्या निवडणूका झाल्या परंतू राज्यातील महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद यांच्या निवडणूका अजून बाकी असल्याचे म्हणत छगन भुजबळ यांनी आपले उपद्रव्य मूल्य दाखविण्यास सुरुवात केली आहे. या नाशिक येथील मेळाव्यात भाषण करताना छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाला आपला कधी विरोध नव्हता आपला विरोध केवळ आमच्या ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नका एवढाच आहे असेही भुजबळ यांनी सांगितले.

त्यांनाच केवळ आपला विरोध

आपल्याला सर्वच ब्राह्मणांनी काही विरोध केलेला नाही. आपले नेते महात्मा फुले यांना त्याकाळात ब्राह्मणांनी मदत केली आहे. पण काहींची मनोवृत्ती कोती असते. पण असे लोक थोडेच असतात जे सोबत असतात असे भुजबळ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की मुलींच्या शाळेला विरोध करणारे तुमच्या आमच्यातीलही होते. आपल्याला शाळेला जागा देणारे ब्राह्मण समाजाचेही लोकही होते. त्यामुळे आपले दुश्मन सर्वच नाही. आपल्याला संपवायला निघाले आहेत त्यांना आपला विरोध आहे. ज्यांना हे समतेचं चक्र उलटं फिरवायचं आहे, त्यांनाच केवळ आपला विरोध असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

आरक्षणाचा उद्देश सफल झाला का ?

छगन भुजबळ पुढे म्हणाले की आरक्षण आरक्षण काय आहे, कशासाठी आहे. आरक्षणाने एका वर्षात पाच वर्षात सर्वच प्रश्न सुटत नाही. सर्व प्रश्न असे सुटले असते तर आरक्षणाची गरज लागली नसती. दलित, आदिवासींना मोठ्या प्रमाणात आरक्षण आहे. कितीतरी दलित आदिवासी समाजातील एसपी, कलेक्टर सापडतील असेही ते म्हणाले. परंतू आजही आपण झोपडपट्ट्यांत गेलो तर दलित आणि आदिवसीच सापडतात. पण भ्रम करून दिला की आरक्षण दिलं म्हणजे घरावर सोन्याचे कौल दिली पण तसं नाही असेही भुजबळ यांनी सांगितले.

Follow Us
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर