AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षाचं ठेवणार का?; उद्धव ठाकरेंनी महायुतीला घेरलं

एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर कोरडे ओढले आहेत

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षाचं ठेवणार का?; उद्धव ठाकरेंनी महायुतीला घेरलं
| Updated on: Dec 17, 2024 | 2:09 PM
Share

राज्यातील नवीन सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी नागपूरात राजभवनावर पार पडल्यानंतर आता हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. नागपूरात एकीकडे थंडीत अधिवेशनात गरमागरमी सुरु असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन होऊन १२ दिवसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांनी शपथ घेतली. आणि आता तर खाते वाटपावरुन यांची खळखळ सुरु असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जर खाते वाटपच झालेले नाही तर अधिवेशन काय टाईमपास म्हणून खेळताय का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

मारकडवाडी येथे झालेल्या दडपशाहीचा उल्लेख करीत त्यांनी ३०० उंबरे असलेल्या गावात ४०० पोलिस आणून ग्रामपंचायतीने घेतलेला अभिरुप बॅलेट निवडणूकीचा निर्णय दडपून टाकल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्ती केली. मतदाराला त्याचे मत नक्की कुठे जातेय हे समजले पाहीजे असेही त्यांनी ठणकावून सांगितले. ते पुढे म्हणाले की निवडणूक आयुक्त निवडून आलेला पाहिजे. तरच त्याला निवडणूक आयुक्त मानलं पाहिजे. मारकवाडी साधं गाव आहे. मग एका गावात मतदान घ्यायला का घाबरता?. ईव्हीएमला जी मते पडली तीच बॅलेट पेपवर येतील ना. लोकशाहीत मी कुणाला मतं देत आहे, ते मला कळलं पाहिजे हे मला कळलं पाहिजे. बॅलेट पेपरवरील मतदान मला कळायचं असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. तोपर्यंत वन नेशन वन इलेक्शन पूर्ण करू नये. महाराष्ट्रात जे घडलं ते कुणालाही पटलेलं नाही. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन डोक्यावर मारू नये. ४००ची वस्ती असलेल्या मारकडवाडीत ३०० पोलीस आणले अशीही टीका त्यांनी केली आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी इंडिया आघाडीत आम्ही एकमेकांत विसर्जित झालो नाही. त्यांची मते त्यांच्याकडे आमची मते आमच्याकडे आहेत असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही अडीच वर्षाने बदलणार का ?

दरवर्षी अनिल परब आणि संजय पोतनीस सुप्रीमो चषक घेतात. तो एकप्रकारचा फिरता चषक असतो. आता मंत्रीपदं फिरते असतील. ज्यांच्या जोरावर झाले ते फिरते. आणि जे झाले ते कायम. मग तु्म्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही अडीच वर्षाने बदलणार का. त्यांना बदलण्याचं ठरलंय का. ते सांगा अशा रोकडा सवालच उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.