AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षाचं ठेवणार का?; उद्धव ठाकरेंनी महायुतीला घेरलं

एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर कोरडे ओढले आहेत

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षाचं ठेवणार का?; उद्धव ठाकरेंनी महायुतीला घेरलं
| Updated on: Dec 17, 2024 | 2:09 PM
Share

राज्यातील नवीन सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी नागपूरात राजभवनावर पार पडल्यानंतर आता हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. नागपूरात एकीकडे थंडीत अधिवेशनात गरमागरमी सुरु असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन होऊन १२ दिवसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांनी शपथ घेतली. आणि आता तर खाते वाटपावरुन यांची खळखळ सुरु असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जर खाते वाटपच झालेले नाही तर अधिवेशन काय टाईमपास म्हणून खेळताय का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

मारकडवाडी येथे झालेल्या दडपशाहीचा उल्लेख करीत त्यांनी ३०० उंबरे असलेल्या गावात ४०० पोलिस आणून ग्रामपंचायतीने घेतलेला अभिरुप बॅलेट निवडणूकीचा निर्णय दडपून टाकल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्ती केली. मतदाराला त्याचे मत नक्की कुठे जातेय हे समजले पाहीजे असेही त्यांनी ठणकावून सांगितले. ते पुढे म्हणाले की निवडणूक आयुक्त निवडून आलेला पाहिजे. तरच त्याला निवडणूक आयुक्त मानलं पाहिजे. मारकवाडी साधं गाव आहे. मग एका गावात मतदान घ्यायला का घाबरता?. ईव्हीएमला जी मते पडली तीच बॅलेट पेपवर येतील ना. लोकशाहीत मी कुणाला मतं देत आहे, ते मला कळलं पाहिजे हे मला कळलं पाहिजे. बॅलेट पेपरवरील मतदान मला कळायचं असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. तोपर्यंत वन नेशन वन इलेक्शन पूर्ण करू नये. महाराष्ट्रात जे घडलं ते कुणालाही पटलेलं नाही. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन डोक्यावर मारू नये. ४००ची वस्ती असलेल्या मारकडवाडीत ३०० पोलीस आणले अशीही टीका त्यांनी केली आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी इंडिया आघाडीत आम्ही एकमेकांत विसर्जित झालो नाही. त्यांची मते त्यांच्याकडे आमची मते आमच्याकडे आहेत असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही अडीच वर्षाने बदलणार का ?

दरवर्षी अनिल परब आणि संजय पोतनीस सुप्रीमो चषक घेतात. तो एकप्रकारचा फिरता चषक असतो. आता मंत्रीपदं फिरते असतील. ज्यांच्या जोरावर झाले ते फिरते. आणि जे झाले ते कायम. मग तु्म्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही अडीच वर्षाने बदलणार का. त्यांना बदलण्याचं ठरलंय का. ते सांगा अशा रोकडा सवालच उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....