AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithviraj Chavan : ओबीसी आरक्षण तुम्ही मिळवून दिलं म्हणताय, मग धनगर आरक्षणही द्या, पृथ्वीराज चव्हाणांचं फडणवीसांना आव्हान

ओबीसी आरक्षणाचा शब्द पाळला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलंय. त्यावर आता काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांना आव्हान दिलंय.

Prithviraj Chavan : ओबीसी आरक्षण तुम्ही मिळवून दिलं म्हणताय, मग धनगर आरक्षणही द्या, पृथ्वीराज चव्हाणांचं फडणवीसांना आव्हान
देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाणImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jul 20, 2022 | 8:42 PM
Share

मुंबई : राज्यातील महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) होणार आहेत. कारण सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बांठिया आयोगाचा अहवालानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 2 आठवड्यात राहिलेल्या निवडणुकीचा प्रक्रिया जाहीर करा, 367 ठिकाणी निवडणूक घ्या, असा आदेश दिलाय. या निर्णयाचं स्वागत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही केलंय. मात्र, यावरुन श्रेयवादाची लढाईही पाहायला मिळत आहे. युती सरकारनं दिलेला ओबीसी आरक्षणाचा शब्द पाळला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलंय. त्यावर आता काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांना आव्हान दिलंय.

‘मग त्यांनी धनगर समाजालाही आरक्षण मिळवून द्यावं’

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात श्रेयवादाची लढाई निश्चितच होत राहील. पण ओबीसींना आरक्षण मिळालं ही चांगली गोष्ट आहे. जर देवेंद्र फडणवीस म्हणत असतील की ओबीसी आरक्षण आम्ही मिळवून दिलं. तर मग अशाच पद्धतीनं त्यांनी धनगर समाजालाही आरक्षण मिळवून द्यावं, असं आव्हान चव्हाण यांनी फडणवीसांना दिलंय. तसंच बांठिया आयोग हा महाविकास आघाडी सरकारने स्थापन केला होता, असंही चव्हाण यांनी आवर्जुन सांगितलं.

शिवसेना नक्की कुणाची हा मुद्दा कोर्टातूनच निकाली निघू शकेल

दरम्यान, एकनाथ शिंदे सरकारमधील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या केसबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवण्यास सांगितलं आहे. पण त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. शिंदे गटाला पार्टी फूट पूर्ण झाली आहे असं दाखवावं लागेल. तोच मुद्दा कोर्टाच्या निरीक्षणात पुढे येईल. सर्व गोष्टी या कोर्टाकडूनच स्पष्ट होऊ शकतात. कारण शिवसेना नक्की कुणाची हा मुद्दा कोर्टाच्या माध्यमातूनच निकाली निघू शकेल, असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलंय.

पुढील सुनावणी 1 ऑगस्टला

दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने या प्रकरणात अनेक संवैधानिक गोष्टी असल्याने हे प्रकरण लार्जर बेंचकडे देण्याचं सूतोवाच केलं. तसेच या प्रकरणावरील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी ठेवली. दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. तर शिंदे गटाच्यावतीने हरीश साळवे आणि महेश जेठमलानी यांनी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.