AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हणजे आपण बाप…सत्तेची मस्ती… नितेश राणेंच्या टीकेला ओमराजेंचे जशास तसे उत्तर; म्हणाले…

आमदार नितेश राणे यांच्या विधानाचा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी थेट मतांची आकडेवारी सांगून सडकून टीका केली आहे.

म्हणजे आपण बाप...सत्तेची मस्ती... नितेश राणेंच्या टीकेला ओमराजेंचे जशास तसे उत्तर; म्हणाले...
omraje nimbalkar and nitesh rane
| Updated on: Jun 08, 2025 | 7:16 PM
Share

भाजपाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी धाराशीवमध्ये केलेल्या विधानाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. त्यांनी सर्वांचा बाप म्हणून राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री बसलेला आहे. 2029 साली भाजपाचेच आमदार निवडून आले पाहिजेत, असं विधान भर सभेत केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार आता ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतला आहे. ओमराजे यांनी नितेश राणे यांना जशास तसे उत्तर दिले आहे.

जनता सूज उतरवल्याशिवाय राहणार नाही

महाराष्ट्रातील जनतेला लक्षात आले असेल की आपण टाकलेल्या मतांची सूज नितेश राणे यांना कशी आलेली आहे. सत्ता आली म्हणजे आपणच मालक झालो असं नसतं. मला वाटतं अशा पद्धतीचं जे वागणं आहे, त्याची सूज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल ओमराजे निंबाळकर यांनी केला.

तिघांच्या मतापेत्राही मला जास्त मतं

नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे या तिघांपेक्षा जास्त मतानी मी निवडून आलो. लोकशाहीमध्ये जनता ही बाप असते. या तिघांच्या पडलेल्या मतांची बेरीज एक लाख 14 हजार 41 एवढी होते. तर धाराशिव लोकसभा मंतदारसंघातून मी तीन लाख 29 हजार 48 मतांनी निवडून आलो. महाराष्ट्रातील दोन नंबरचे मताधिक्य देऊन मला जनतेने संसदेत पाठवले, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी नितेश राणे यांना लगावला.

लोकशाहीमध्ये आपण निवडून आलो, आपली सत्ता आली म्हणजे आपण बाप झालो असे नाही. ही सत्तेची मस्ती आहे. जनता ही मस्ती लवकरच उतरवेल, असा थेट हल्लाबोल ओमराजे निंबाळकर यांनी केला.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?

नितेश राणे यांनी धाराशीवमध्ये एका सभेत भाषण केले. या भाषणादरम्यान सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री बसला आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. 2029 साली भाजपाचेच सगळे आमदार निवडून आले पाहिजेत, असं नितेश राणे म्हणाले होते. या विधानावर नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीमधील वातावर चांगलं राहिलं पाहिजे. नितेश राणे यांनी जपून बोलावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....