AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा’, सुषमा अंधारे कडाडल्या, ‘त्या’ प्रकरणावरुन घेरण्याचा प्रयत्न

"देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे खुर्चीला चिटकून बसले आहेत. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. फडणवीस देणार का? देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा", अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

'देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा', सुषमा अंधारे कडाडल्या, 'त्या' प्रकरणावरुन घेरण्याचा प्रयत्न
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 07, 2023 | 11:34 PM
Share

परभणी : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा आज परभणीत पोहोचली. यावेळी सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता या गोष्टीची आठवण करुन दिली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस धमकी प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

“देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे खुर्चीला चिटकून बसले आहेत. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. फडणवीस देणार का? देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा”, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. “माझी फडणवीस यांच्यासोबत दुश्मनी नाही. सत्तेचा लोभ त्यांनी बाजूला ठेवावा”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

“अमृता फडणवीस प्रकरणात सखोल निष्पक्षपाती चौकशी व्हावी यासाठी फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. आता फडणवीस यांच्या पत्नीची चौकशी सुरु आहे. फडणवीस यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही मी पुन्हा येईल पुन्हा येईल असा आक्रस्तळंपणा करणार नाही”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

‘मी लढेन आणि मीच जिंकेन’

“दोन-चार कॅबिनेट मंत्री माझ्यावर बोलतात. इतकं झालं तरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गप्प आहेत. मी चळवळीचे शास्त्र शिकले आहे. कितीही टीका झाली, चारित्र्यहनन केले तरी मी भीक घालणार नाही. मी लढेन आणि मीच जिंकेन”, असा विश्वास अंधारे व्यक्त केला. “मला डॅमेज आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा दावा त्यांनी केला.

“पोलिसांना हप्ते नावाची गोष्ट कळते राज्यात वचक राहिला नही. मला उसकावण्याचा प्रयत्न केले जात आहेत, मी काही चुकेल का? कुठे अडकेल का हे पहिले जात आहे. मी कायद्याचं संविधानचं बोलतेय. उगाच टीका करीत नही, मूळ मुद्यावर चर्चा करीत नाहीत. त्यानी संभाजी नगर येथे सावरकर गौरव यात्रा काढली त्यांना 83 लोक शिल्लक होते”, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

सुषमा अंधारे यांनी यावेळी खासदार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेवर आपल्या भाषणात भूमिका मांडली. “वज्रमूठ सभेनंतर संभाजीनगर येथे गोमूत्र शिंपडले. तुम्ही मुस्लिम, बुद्ध, इतर 18 पगड जातीचा समाजाचा अपमान करताय. या अपमानाचा बदला घ्यायचा. आमच्या स्पर्शाचा विटाळ होतो. गोमूत्र शिंपडणारी ही नवनीत राणा प्रवृत्ती आहे ते तुम्हाला माणूस नव्हे तर जनावर समजतात”, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.