AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा’, सुषमा अंधारे कडाडल्या, ‘त्या’ प्रकरणावरुन घेरण्याचा प्रयत्न

"देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे खुर्चीला चिटकून बसले आहेत. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. फडणवीस देणार का? देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा", अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

'देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा', सुषमा अंधारे कडाडल्या, 'त्या' प्रकरणावरुन घेरण्याचा प्रयत्न
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: Chetan Patil | Updated on: Apr 07, 2023 | 11:34 PM
Share

परभणी : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा आज परभणीत पोहोचली. यावेळी सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता या गोष्टीची आठवण करुन दिली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस धमकी प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

“देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे खुर्चीला चिटकून बसले आहेत. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. फडणवीस देणार का? देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा”, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. “माझी फडणवीस यांच्यासोबत दुश्मनी नाही. सत्तेचा लोभ त्यांनी बाजूला ठेवावा”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

“अमृता फडणवीस प्रकरणात सखोल निष्पक्षपाती चौकशी व्हावी यासाठी फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. आता फडणवीस यांच्या पत्नीची चौकशी सुरु आहे. फडणवीस यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही मी पुन्हा येईल पुन्हा येईल असा आक्रस्तळंपणा करणार नाही”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

‘मी लढेन आणि मीच जिंकेन’

“दोन-चार कॅबिनेट मंत्री माझ्यावर बोलतात. इतकं झालं तरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गप्प आहेत. मी चळवळीचे शास्त्र शिकले आहे. कितीही टीका झाली, चारित्र्यहनन केले तरी मी भीक घालणार नाही. मी लढेन आणि मीच जिंकेन”, असा विश्वास अंधारे व्यक्त केला. “मला डॅमेज आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा दावा त्यांनी केला.

“पोलिसांना हप्ते नावाची गोष्ट कळते राज्यात वचक राहिला नही. मला उसकावण्याचा प्रयत्न केले जात आहेत, मी काही चुकेल का? कुठे अडकेल का हे पहिले जात आहे. मी कायद्याचं संविधानचं बोलतेय. उगाच टीका करीत नही, मूळ मुद्यावर चर्चा करीत नाहीत. त्यानी संभाजी नगर येथे सावरकर गौरव यात्रा काढली त्यांना 83 लोक शिल्लक होते”, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

सुषमा अंधारे यांनी यावेळी खासदार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेवर आपल्या भाषणात भूमिका मांडली. “वज्रमूठ सभेनंतर संभाजीनगर येथे गोमूत्र शिंपडले. तुम्ही मुस्लिम, बुद्ध, इतर 18 पगड जातीचा समाजाचा अपमान करताय. या अपमानाचा बदला घ्यायचा. आमच्या स्पर्शाचा विटाळ होतो. गोमूत्र शिंपडणारी ही नवनीत राणा प्रवृत्ती आहे ते तुम्हाला माणूस नव्हे तर जनावर समजतात”, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं.

Follow Us
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...