AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election : आघाडीचा जीव भांड्यात ! भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले, आव्हाड, ठाकूरांची मतं वैध

भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले.

Rajya Sabha Election : आघाडीचा जीव भांड्यात ! भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले, आव्हाड, ठाकूरांची मतं वैध
जितेंद्र आव्हाड, मंत्रीImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 10, 2022 | 1:59 PM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांच्या मतदानावर भाजपनं (BJP) आक्षेप घेतला होता. आव्हाडांनी मतपत्रिका जयंत पाटलांच्या हातात दिली. तर ठाकूर यांनी मतपत्रिका एजंटला दाखवली. त्यामुळे ही दोन्ही मते बाद करण्याची मागणी भाजपनं केली होती. मात्र, निवडणूक अधिकाऱ्याने ही मागणी फेटाळली असून महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडलाय. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आधीच घोडेबाजार होत असल्याच्या चर्चा होत्या. यातच राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवलं होतं. कोणताही आमदार फुटू नये, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून खबरदारी घेतली जात होती. आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झालं. यावेळी अगदी एक-एक मतासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रयत्न होत असल्याचंही दिसून आलं. त्यातच आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मते अवैध ठरवण्याची मागणी भाजपनं केली होती. यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणखी चिंतेत आले होते.

नेमकं काय झालं?

राज्यसभेच्या निवडणुकीचं मतदान सुरू असताना यात दोन पोलिंग एजंटनें तीन मतांवर आक्षेप घेतला. भाजप आमदार पराग आळवणी आणि अतुल सावे यांच्या पोलिंग एजंटने आक्षेप घेतला. यानंतर व्हिडीओ शूटिंग बघितलं जावं, अशी मागणी करण्यात आली. यशोमती ठाकूर, सुहास कांदे, आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर भाजपनं यावेळी आक्षेप घेतला. ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका एजंटच्या हातात दिली. हातात द्यायची नसते तर दुरून दाखवायची असते, असं त्यावेळी म्हटलं गेलं. दरम्यान, भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले आणि महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला.

आव्हाडांची जोरदार टीका

दरम्यान, भाजप नेते बावचाळले, अशी जोरदार टीका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. जितेंद्र आव्हाड काय म्हणाल पाहा…

यशोमती ठाकूर यांची टीका

भाजपनं केलेल्या मागणीवर काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की,  महाविकास आघाडीचे उमेदवार येत आहेत. दुसरीकडे मात्र भाजपचे पडत आहेत. जसं महाराष्ट्रात वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपने केला तसाच प्रयत्न पोलिंग बूथ ठिकाणी करण्यात आला. त्यांचा उमेदवार पडणार लक्षात आल्यानंतर त्यांनी असा प्रयत्न केला, अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी यावेळी केली आहे. तर महाविकास आघाडीच्या इतरही नेत्यांनी यावेळी टीका केलीय.

Follow Us
राज्यसभा निवडणूक बिनविरोध, 7 उमेदवार थेट खासदार! अडसूळ मात्र नाराज
राज्यसभा निवडणूक बिनविरोध, 7 उमेदवार थेट खासदार! अडसूळ मात्र नाराज.
बिहारमध्ये राजकीय भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्री भाजपचा?
बिहारमध्ये राजकीय भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्री भाजपचा?.
सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंचे मानले आभार; काय आहे कारण?
सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंचे मानले आभार; काय आहे कारण?.
टीम इंडिया चौथ्यांद टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!
टीम इंडिया चौथ्यांद टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!.
जनतेचा, मित्रपक्षांचा मनापासून ऋणी; शरद पवारांचं ट्विट
जनतेचा, मित्रपक्षांचा मनापासून ऋणी; शरद पवारांचं ट्विट.
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.