AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election : आघाडीचा जीव भांड्यात ! भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले, आव्हाड, ठाकूरांची मतं वैध

भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले.

Rajya Sabha Election : आघाडीचा जीव भांड्यात ! भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले, आव्हाड, ठाकूरांची मतं वैध
जितेंद्र आव्हाड, मंत्रीImage Credit source: tv9
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Jun 10, 2022 | 1:59 PM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांच्या मतदानावर भाजपनं (BJP) आक्षेप घेतला होता. आव्हाडांनी मतपत्रिका जयंत पाटलांच्या हातात दिली. तर ठाकूर यांनी मतपत्रिका एजंटला दाखवली. त्यामुळे ही दोन्ही मते बाद करण्याची मागणी भाजपनं केली होती. मात्र, निवडणूक अधिकाऱ्याने ही मागणी फेटाळली असून महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडलाय. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आधीच घोडेबाजार होत असल्याच्या चर्चा होत्या. यातच राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवलं होतं. कोणताही आमदार फुटू नये, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून खबरदारी घेतली जात होती. आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झालं. यावेळी अगदी एक-एक मतासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रयत्न होत असल्याचंही दिसून आलं. त्यातच आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मते अवैध ठरवण्याची मागणी भाजपनं केली होती. यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणखी चिंतेत आले होते.

नेमकं काय झालं?

राज्यसभेच्या निवडणुकीचं मतदान सुरू असताना यात दोन पोलिंग एजंटनें तीन मतांवर आक्षेप घेतला. भाजप आमदार पराग आळवणी आणि अतुल सावे यांच्या पोलिंग एजंटने आक्षेप घेतला. यानंतर व्हिडीओ शूटिंग बघितलं जावं, अशी मागणी करण्यात आली. यशोमती ठाकूर, सुहास कांदे, आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर भाजपनं यावेळी आक्षेप घेतला. ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका एजंटच्या हातात दिली. हातात द्यायची नसते तर दुरून दाखवायची असते, असं त्यावेळी म्हटलं गेलं. दरम्यान, भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले आणि महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला.

आव्हाडांची जोरदार टीका

दरम्यान, भाजप नेते बावचाळले, अशी जोरदार टीका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. जितेंद्र आव्हाड काय म्हणाल पाहा…

यशोमती ठाकूर यांची टीका

भाजपनं केलेल्या मागणीवर काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की,  महाविकास आघाडीचे उमेदवार येत आहेत. दुसरीकडे मात्र भाजपचे पडत आहेत. जसं महाराष्ट्रात वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपने केला तसाच प्रयत्न पोलिंग बूथ ठिकाणी करण्यात आला. त्यांचा उमेदवार पडणार लक्षात आल्यानंतर त्यांनी असा प्रयत्न केला, अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी यावेळी केली आहे. तर महाविकास आघाडीच्या इतरही नेत्यांनी यावेळी टीका केलीय.

Follow Us
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!