मोदी हे हिटलर आणि खोमेनीचे मिश्रण, ते देशाला…; संजय राऊत यांचा हल्लाबोल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक 'सामना'तील 'रोखठोक' या सदरातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. राऊत यांनी मोदी यांची तुलना खोमेनी आणि हिटलरशी केली आहे.

मोदी हे हिटलर आणि खोमेनीचे मिश्रण, ते देशाला...; संजय राऊत यांचा हल्लाबोल
pm narendra modiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 7:03 AM

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. नऊ वर्ष राज्य करूनही पंतप्रधान नरेंदऔ मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे हिंदू देव लागतात. लोकांना धर्मकारणात धुंद करून नशेबाज करायचे आणि निवडणुका जिंकायच्या. हिटलर आणि खोमेनीचे हे मिश्रण आहे. देशाला ते परवडणारे नाही. देश अशाने संपून जाईल. पुन्हा कुणाचा तरी गुलाम होईल. त्यामुळे लोकांनी एकवटायला हवे. निर्भय व्हावे लागेल, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरातून हा हल्ला चढवला आहे. भारतीय राज्य घटना दुटप्पीपणा करणार नाही. पण राजकारणी बिघडतील. त्यातून सगळं बिघडेल, असा धोका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्तवला होता. आंबेडकरांचे हे म्हणणे मोदी आणि शाह यांनी सत्यात उतरवले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. धर्माचे राजकारण आणि व्होट बँकेचे राजकारण घटना रोखू शकत नाही. देशाचा आजचा गोंधळ सावरण्यास घटना अपुरी पडत आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘रोखठोक’ आसूड जसेच्या तसे…

या देशात नवे हिंदुत्वाचे वातावरण तयार करण्यात आले आहे. त्यातून दोन खोमेनी निर्माण झाले आहेत. त्यातूनच आता असंख्या खोमेनी निर्माण करून देश इराण, सीरिया आणि अफगाणिस्तानच्या पद्धतीने चालवला जाईल.

संसदीय लोकशाहीच्या मुखवट्याखाली हुकूमशाही चालते आणि हुकूमशहा हवा म्हणून हिंदुत्वाचे कार्ड चालवले जाते. सामान्य मतदारांनी विचार करण्याचा हा काळ आहे. आपण सार्वभौम आहोत. इतका गैरसमज जरी सध्या दूर झाला तरी पुरे आहे.

राजकीय पक्षांना टिकू द्यायचे नाही. सर्व सत्ता दोघांकडे असावी हा विचार म्हणजे घोटाळा आहे. देशात गवतासारख्या वाढणाऱ्या आणि फुटणाऱ्या राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या तावडीतून देशाला सोडवण्याची गरज असताना पंतप्रधान फोडाफोडीस उत्तेजन देत आहे.

सरकारला अडचणीचे ठरणारे निर्णय सुप्रीम कोर्ट घेत नाही. तारखांची शर्यत सुरूच ठेवते. मुंबईसह 14 महापालिकांच्या निडवणुका रोखण्याचे कारण नव्हते. कोर्ट निवडणुका घेऊ देत नाही. हे सरकारला आणि भाजपला हवेच आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर गेली 15 वर्ष तारखांशिवाय काहीच घडत नाही. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरचा निर्णय अधांतरी आहे. सर्व काही घटनेनुसार होईल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.

धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?.
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?.