AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेड, बारामती, माढासह 22 जागा द्या, प्रकाश आंबेडकरांची नवी मागणी

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भारिपला आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बैठकांवर बैठका होत आहेत. पण भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचं आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने 22 जागांची मागणी केली आहे. या 22 जागांवर प्रकाश आंबेडकरांकडून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. भारिपने ज्या 22 जागा […]

नांदेड, बारामती, माढासह 22 जागा द्या, प्रकाश आंबेडकरांची नवी मागणी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भारिपला आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बैठकांवर बैठका होत आहेत. पण भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचं आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने 22 जागांची मागणी केली आहे. या 22 जागांवर प्रकाश आंबेडकरांकडून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत.

भारिपने ज्या 22 जागा जाहीर केल्यात, त्या 22 जागा हव्यात. त्यात मागेपुढे होऊ शकतं, पण आम्हाला जास्तीत जास्त जागा हव्यात. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट होईल का माहित नाही. पण वंचित बहुजन आघाडीची जास्तीत जास्त जागांची मागणी आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकीनंतर सांगितलं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी मसुदा द्या, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही बैठकीला उपस्थित होते. आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं ते म्हणाले.

“भारिपने मागितलेल्या 22 जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा यांचाही समावेश आहे. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याची आमची मनापासून इच्छा आहे. त्यांना अजूनही विनंती करु. त्यांनी या तीन जागा मागितल्या आहेत याचा अर्थ ते चर्चा करायला तयार आहेत. पक्षश्रेष्ठी ठरवतील की मोदी लाटेतही निवडून आलेल्या जागा सोडायच्या किंवा नाही. सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांना निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांकडून आघाडीकडे याअगोदर 12 जागांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता 22 जागा द्या ही नवी मागणी करण्यात आल्याने आघाडीच्या नेत्यांचीही डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे. विविध जिल्ह्यात सभा घेताना या सभेतच प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत 22 उमेदवार जाहीर केले आहेत. या सर्व जागा आम्हाला सोडव्या, असं त्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या जागांमध्ये मोदी लाटेतही निवडून आलेल्या जागांचा समावेश आहे.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.