AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘प्रकाश आंबेडकरांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही’

मुंबई: “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठीच प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार उभे केले आहेत. मात्र त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही”, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणावर प्रकाशझोत टाकला. यावेळी मुणगेकर यांनी वंचित आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, आले तर प्रकाश […]

‘प्रकाश आंबेडकरांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही’
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

मुंबई: “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठीच प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार उभे केले आहेत. मात्र त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही”, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणावर प्रकाशझोत टाकला. यावेळी मुणगेकर यांनी वंचित आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, आले तर प्रकाश आंबेडकर निवडून येतील, असा अंदाज वर्तवला.

भालचंद्र मुणगेकर म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांनी 48 जागी उमेदवार दिले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी जे उमेदवार उभे केले आहेत, ते केवळ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी किंवा आघाडीची मतं कमी व्हावी यासाठीच आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या 48 उमेदवारांपैकी प्रकाश आंबेडकर सोडून कोणीही निवडून येणार नाही”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वापरत प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले राजकारण करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताला निवडून देण्याचे आवाहन केले जात आहे, असं मुणगेकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांना न मानणारा मोठा दलित समाज आहे, जो काँग्रेससोबत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या बहुजन मतांचे विभाजन होणार नाही, असा विश्वास मुणगेकरांनी व्यक्त केला.

आघाडीचे उमेदवार पाडण्यासाठी हे उमेदवार देण्यात आले आहेत. दलित मते ही प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले केवळ यांच्या पाठीशी नाहीत. अनेक दलित संघटना आहेत त्यांच्या मागे दलित मते आहेत.

प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्या राजकीय भूमिका निर्णायक वळणावर आल्यावर निषेधार्ह आहे. रामदास आठवले केवळ दया माया करुन मंत्रीपद मिळविण्याचा कार्यक्रम करत आहेत, असंही मुणगेकर म्हणाले.

“ ही सातरावी निवडणूक आहे.आता पर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. देशातील सर्व पक्ष एका बाजूला आणि नरेंद्र मोदी एका बाजूला अशी परिस्थिती आहे. आधी भाजपसोबत 20 पक्ष होते, मात्र आता केवळ अकाली दल आणि शिवसेना केवळ हेच दोन पक्ष भाजपच्या बाजूने आहे”, असं मुणगेकरांनी निदर्शनास आणलं.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.