AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी केलेले आरोप दिशाभूल करणारे -प्रताप पाटील चिखलीकर

अशोक चव्हाण यांनी केलेले आरोप दिशाभूल करणारे- प्रताप पाटील चिखलीकर

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी केलेले आरोप दिशाभूल करणारे -प्रताप पाटील चिखलीकर
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jul 09, 2022 | 4:02 PM
Share

नांदेड : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नांदेड मध्ये पत्रकार परिषद घेत अनेक आरोप केले, ते दिशाभूल करणारे आहेत. फडणवीस सरकार गेलं तेव्हा सर्व कामांना महाविकास आघाडीकडून स्थगिती मिळाली होती. अशोक चव्हाण यांनी एक काम केलं अणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात अनेक प्रोजेक्ट राबवले. मागच्या सरकारने काहीही भुमिका घेतली नाही. अशोक चव्हाण यांनी जनतेला उत्तरं दिलं पाहिजे. ते सांगतात आम्ही केलं पण इतकी वर्ष लेंडी प्रकल्प का झाला नव्हता, असं म्हणत खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांनी अशोक चव्हाण यांच्या आरोपांचं खंडण केलं आहे. शिवाय अशोक चव्हाण यांच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचंही चिखलीकर म्हणाले आहेत.

“मोदी सरकार हे विकासाच सरकार आहे. अशोक चव्हाण यांनी एक प्लांट उभा केला पण नरेंद्र मोदी यांनी 2 प्लांट उभे केले. चव्हाण यांच्यासारखा एका क्रमांकाचा माणूस आता सत्तेसाठी कोणत्या पदाला गेला. महाराष्ट्रातले सर्वात बकाल शहर नांदेड शहर आहे. अशोक चव्हाण यांनी काहीही कामे केली नाहीत. सरकार जाणार असताना अनेक कामे नियम बाह्य केली गेली. नांदेडचा आम्ही सर्वे केला निधी मिळवून देण्यासाठी चव्हाण यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत”, असंही चिखलीकर म्हणाले आहेत.

“लेंडी प्रकल्प रखडला, का रखडला अशोक चव्हाण यानी यावर उत्तर द्यायला हवे. प्रत्येक निवडणुकीत या प्रकल्पाचा उल्लेख चव्हाण करतात. आज या प्रकल्पाची आताची किंमत 600 कोटींवर केली आहे.अशोक चव्हाण हे वरच्या स्थानवरून खाली आले. नांदेडमध्ये DPDC ची बैठक घेऊन कामे मंजूर केली. नांदेड भकास केलं. नांदेडमध्ये रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हे कळत नाही”, असं म्हणत चिखली कर यांनी अशोक चव्हाण यांच्या कामावर टीका केली आहे.

“अशोक चव्हाण याचा अभिनंदन करेल. शहराच्या नामांतरला पाठिंबा दिला त्यामुळे मनापासून आभार. अनेक वर्ष सत्तेत राहून चव्हाण यानी का प्रकल्प पूर्ण केले नाही.५० वर्ष त्यांच्या घरात सत्ता होती का नाही नांदेडमध्ये एकही नॅशनल हायव्हे नाही. ५० वर्षात एकही हायवे करता येत नाही. त्या नांदेडमध्ये गडकरींनी रस्ते बांधायला सुरूवात केली. लोकांना उपदेश करण्यापेक्षा आपण काय केलं यावर आत्मचितन करावं. सरकार पडत असल्याचे माहित असतानाही डिपीडिसीची बैठक लावली.निवडणुक डोळ्यासमोर ठेवून काम आम्ही करत नाही. नांदेडमध्ये यांनी काम कमी आणि खड्डे जास्त खोदले मात्र चव्हाण याचं एकचं कौतुक करीन कि औरंगाबादचं संभाजी नगर नामांतरण केलं उस्मानाबादचं धाराशीव हे नामांतरण केलं, याबाबत चव्हाणांचं मी कौतुक करतो”, असंही चिखलीकर म्हणालेत.

Follow Us
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट