AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi on Shinzo Abe : शिंजो आबे यांच्या निधनावर पंतप्रधान मोंदींनी व्यक्त केली भावपूर्ण श्रद्धांजली, घरचा व्यक्ती गेल्यासारखं दुःख होत असल्याची भावना

गुजरातला अधिक सक्षम करण्यासाठी जपानचे सहकार्य खूप मोठे होते. त्यानंतर भारत आणि जपानमध्ये धोरणात्मक सहकार्य करण्यात आले. सुरक्षेसंदर्भातही त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्याचा भारतालाही फायदा झाला.

PM Modi on Shinzo Abe : शिंजो आबे यांच्या निधनावर पंतप्रधान मोंदींनी व्यक्त केली भावपूर्ण श्रद्धांजली, घरचा व्यक्ती गेल्यासारखं दुःख होत असल्याची भावना
शिंजो आबे, पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Jul 09, 2022 | 5:06 PM
Share

नवी दिल्ली : शिंजो आबे हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान होते. जागतिक राजनितीज्ञ होते. भारत-जपान मैत्रीचे पुरस्कर्ते होते. शिंजो आबे यांच्या निधनामुळं जगातल्या एका मोठ्या दूरदृष्टी असलेल्या नेत्याला आपण मुकलो आहोत. मी वैयक्तिरीत्या एक चांगला मित्र गमावला आहे, अशी भावपूर्ण श्रद्धांजली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मोदी म्हणतात, मी शिंजो आबे यांना पहिल्यांदा 2007 मध्ये भेटलो. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. या मैत्रीनं प्रोटोकालचे नियमही बाद केलेत. शिंजो आबे यांच्यासोबतचे बरेच अविस्मरणीय क्षण आहेत. क्योटो येथील तोजी मंदिराला (Toji Temple) दिलेली भेट, शिंकानसेन येथील ट्रेनचा प्रवास, अहमदाबादमधील (Ahmedabad) साबरमती आश्रमाला दिलेली भेट, काशीतील गंगा (Ganga) आरती हे काही त्यापैकी अविस्मरणीय क्षण.

अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

pm 2

शिंजो आबे पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताच्या सक्षमीकरणात मोठा हिस्सा

2007 ते 2012 ला शिंजो आबे हे जपानचे पंतप्रधान नव्हते. तेव्हाही आमचे संबंध अधिकच मजबूत होत गेलेत. सरकार, अर्थशास्त्र, संस्कृती, परदेश धोरण आदी विषयांवर त्यांच्याकडं नावीन्यपूर्ण कल्पना होत्या. गुजरातला अधिक सक्षम करण्यासाठी जपानचे सहकार्य खूप मोठे होते. त्यानंतर भारत आणि जपानमध्ये धोरणात्मक सहकार्य करण्यात आले. सुरक्षेसंदर्भातही त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्याचा भारतालाही फायदा झाला. भारत-जपान संबंधावर त्यांना पद्म विभूषण 2021 चा पुरस्कार देण्यात आला.

pm 3

शिंजो आबे, पंतप्रधान नरेंद्र मोदी

घरचा व्यक्ती गेल्यासारखं वाटत

यंदा मे महिन्यात जपान दौऱ्यात शिंजो आबे यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी जपान-भारत संघटनेच्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळला होता. कोणालाही आकर्षित करेल, असं हे व्यक्तिमत्व होतं. वेळेवर काय आणि कसं बोलावं, याची त्यांना चांगली जाण होती. भारत-जपान संबंध मजबूत करण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना त्यांच्याकडं होत्या. मे महिन्यात झालेली भेट शेवटची ठरेल, असं वाटलं नव्हतं, असं मोदी म्हणतात.

pm 5

शिंजो आबे, पीएम नरेंद्र मोदी

संपूर्ण जग त्यांचं ऋणी राहील

शिंजो आबे यांना जगातील घडामोडींची जाणीव होती. त्यांच्याकडं दूरदृष्टीकोण होता. त्यामुळंच जागतिक राजनैतिक, सामाजिक, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय घटनांवर त्यांचा प्रभाव होता. धाडसी निर्णय ते घेत होते. संपूर्ण जगाला समजून घेऊन ते त्यांची वाटचाल करीत होते. शिंजो आबे यांच्या धोरणांनी जपानी अर्थव्यवस्थेला मजबूत केले. जागतिक पातळीवर केलेल्या कामांमुळं संपूर्ण जग त्यांचं ऋणी राहील.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.