AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithviraj Chavan : कॉंग्रेसमधील सध्याची परिस्थिती चिंताजनक, राहूल गांधी चार वर्षापासून भेटले नाहीत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली खंत

congress news : पृथ्वीराज चव्हाण जेव्हा दिल्लीत असतात तेव्हा ते अधूनमधून डॉ. मनमोहन सिंग यांना भेटतात, त्यांची प्रकृती आता पूर्वीसारखी राहिली नाही. ते रूग्णालयात आहेत, तरीही ते वेळ मागितल्यावर बोलायला तयार असतात. तसेच सोनिया गांधी यांच्याकडे वेळ मागितल्यावर त्या सुद्धा भेटतात.

Prithviraj Chavan : कॉंग्रेसमधील सध्याची परिस्थिती चिंताजनक, राहूल गांधी चार वर्षापासून भेटले नाहीत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली खंत
कॉंग्रेसमधील सध्याची परिस्थिती चिंताजनकImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 03, 2022 | 7:10 AM
Share

नवी दिल्ली – आठ वर्षापूर्वी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं सरकार दिल्लीत सत्तेत आलं आणि कॉंग्रेसला (Congress) उतरती कळा लागली. तेव्हापासून कॉंग्रेस राजकारणात देशात चाचपडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. अनेक राज्यातील सत्ता गेल्याने थेट कॉंग्रेस नेतृत्वावरती अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच कॉंग्रेसमधील नेत्यांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे देखील वारंवार उघडकीस आले आहे. नुकतेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी राहूल गांधी (Rahul Gandhi) यांना मागच्या चार वर्षात भेटलो नाही असं विधान केलं आहे. हे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात कोणतेही चिंतन किंवा आत्मपरीक्षण झाले नाही, असे देखील चव्हाण यांनी सांगितले आहे.

राहूल गांधीची चार वर्षापासून भेट नाही

पृथ्वीराज चव्हाण जेव्हा दिल्लीत असतात तेव्हा ते अधूनमधून डॉ. मनमोहन सिंग यांना भेटतात, त्यांची प्रकृती आता पूर्वीसारखी राहिली नाही. ते रूग्णालयात आहेत, तरीही ते वेळ मागितल्यावर बोलायला तयार असतात. तसेच सोनिया गांधी यांच्याकडे वेळ मागितल्यावर त्या सुद्धा भेटतात. परंतु राहूल गांधी यांना मागच्या चार वर्षापासून भेटता आले नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

प्रामाणिक आत्मपरीक्षण व्हायला हवे

उदयपूरच्या चिंतन बैठकीबद्दल त्यांनी अनेक वक्तव्ये केली आहेत. काँग्रेस अध्यक्षांनी पक्षासमोर निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी चिंतन शिबिर आयोजित करण्याचे मान्य केले होते. परंतु कोणीतरी “राजापेक्षा अधिक निष्ठावान” असा निर्णय घेतला की चिंतन किंवा आत्मपरीक्षण करण्याची गरज नाही. त्यामुळे उदयपूरची बैठक नवसंकल्प शिबिर होती. पक्षाला असे वाटले की शवविच्छेदनाची गरज नाही आणि फक्त भविष्याकडे पाहण्याची गरज आहे. प्रामाणिक आत्मपरीक्षण व्हायला हवे असंही चव्हाण म्हणाले.

मोदींचा पराभव करण्यासाठी व्यापक युती करावी लागेल

2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करायचा असेल, तर येत्या 12 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करावी लागेल असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच सगळ्यांना मिळून एक समविचारी पक्षांची एक मोठी युती तयार करावी लागेल.

समजा 2024 मध्ये आपला पराभव झाल्यास उदारमतवादी लोकशाहीचा आत्मा नष्ट होईल असंही त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं.

Follow Us
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...