AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबमध्ये आपचा ‘झाडू’ फिरला, महाराष्ट्र आणि देशात किती संधी? जाणून घ्या टीव्ही 9 चा पोल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनाही पराभवाची चव चाखावी लागलीय. या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपली महत्वाकांक्षा स्पष्ट करत आता देशभरात इन्कलाब होईल असं म्हटलंय. या पार्श्वभूमीवर आगामी काळात महाराष्ट्रात काँग्रेसला किती संधी आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही पोलद्वारे केलाय.

पंजाबमध्ये आपचा 'झाडू' फिरला, महाराष्ट्र आणि देशात किती संधी? जाणून घ्या टीव्ही 9 चा पोल
भगवंत मान, अरविंद केजरीवालImage Credit source: ANI
sagar joshi
sagar joshi | Updated on: Mar 10, 2022 | 11:58 PM
Share

मुंबई : दिल्लीतील सत्ताधारी आम आमदी पक्षाने (Aam Adami Party) सीमोल्लंघन करत पंजाबमध्ये जोरदार झाडू फिरवत काँग्रेसचा सुपडा साफ केलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि भगवंत मान (Bhagwant Man) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पंजाबच्या जनतेचं आपल्या पदरात घवघवीत यश टाकलं. पंजाबमध्ये आपन तब्बल 92 जागांवर आघाडी घेतलीय. तर काँग्रेसला केवळ 18 जागांवर समाधान मानावं लागलंय. इतकंच नाही तर विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी (CharanjitSingh Channi) यांचा दोन्ही मतदारसंघात पराभव झालाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनाही पराभवाची चव चाखावी लागलीय. या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपली महत्वाकांक्षा स्पष्ट करत आता देशभरात इन्कलाब होईल असं म्हटलंय. या पार्श्वभूमीवर आगामी काळात महाराष्ट्रात काँग्रेसला किती संधी आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही पोलद्वारे केलाय.

आम्ही यूट्युब पोलद्वारे प्रेक्षकांना प्रश्न विचारला की ‘आप’ हा देशात काँग्रेसची जागा घेणार का? यावर पाच तासात एक लाखापेक्षा अधिक नागरिकांनी आपलं मत मांडलं. त्यात 64 टक्के नागरिकांनी होय आम आदमी पक्ष देशात काँग्रेसची जागा घेईल असं म्हटलंय. तर 27 टक्के लोकांना आप काँग्रेसची जागा घेणार नाही असं वाटतंय. 9 टक्के लोक मात्र सांगता येत नाही असं म्हणत आहेत.

Youtube Poll

‘आप”बाबत यूट्युबवर टीव्ही 9 मराठीचा पोल

तर यूट्युब कम्युनिटीवर आम्ही महाराष्ट्रातील आगामी मनपा आणि झेडपी निवडणुकीत आपला संधी आहे असं वाटता का? असा सवाल केला. या पोलमध्ये 55 हजारापेक्षा अधिक लोकांनी सहभागी घेतला. तेव्हा 62 टक्के नागरिकांनी आपला महाराष्ट्रात संधी नसल्याचं म्हटलंय. 34 टक्के लोकांना वाटतं की आप महाराष्ट्रातही किमया करु शको. तर 4 टक्के नागरिक सांगता येत नाही असं म्हणत आहेत.

Youtube Community Poll

महाराष्ट्रातील मनपा, झेडपी निवडणुकीत आपला संधी आहे का? जाणून घ्या पोल

आपमध्ये प्रवेश करण्याचं केजरीवालांचं आवाहन

पंजाबमधील विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी महिला, युवक, शेतकरी, गरीब जनता अशा सर्वांना आम आदमी पार्टीत प्रवेश करण्याचं आवाहन केलंय. आज मोबाईल रिपेअर करणाऱ्या दुकानात नोकरी करणाऱ्या व्यक्तीने चरणजितसिंह चन्न यांचा पराभव केलाय. आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता नवज्योतने मजीठिया यांचा पराभव केला, सिद्धू यांचाही पराभूत केला. त्यामुळे आता आम आदमी पार्टीत प्रवेश करण्याचं आवाहन केजरीवाल यांनी जनतेला केलंय.

इतर बातम्या :

अशा लोकांना जाती-धर्मातून दूर करा, महाराष्ट्रातल्या नवाब मलिक प्रकरणावर शरद पवारांना मोदींचं थेट उत्तर ?

PM Narendra Modi Speech : पंतप्रधान मोदींकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत कोणते संकेत? मोदींच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली