AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांनी हे ध्यानात घ्यावं की इंदिरा गांधी यांनीच…; जे पी नड्डा यांचा घणाघात

J P Nadda On Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यावर टीका करताना जे पी नड्डा यांच्याकडून इंदिरा गांधींचा दाखला; म्हणाले...

राहुल गांधी यांनी हे ध्यानात घ्यावं की इंदिरा गांधी यांनीच...; जे पी नड्डा यांचा घणाघात
| Updated on: Jun 15, 2023 | 8:23 AM
Share

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी हे लक्षात ठेवावं की, त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनीच देशात आणीबाणी लादली होती, असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त भाजपचं मेगा जनसंपर्क अभियान सुरू आहे. त्यासाठी पंजाबमधील होशियारपूरमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे बोलताना नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यादरम्यान केलेल्या वक्तव्यांवर जे पी नड्डा यांनी टीका केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात भारताची प्रतिमा उंचावत असताना ‘काँग्रेसचे युवराज’ राहुल गांधी देशाची प्रतिमा डागाळत आहेत, असाही घणाघात जे पी नड्डा यांनी केला आहे.

केवळ भाजप हाच विचारधारेवर आणि कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष आहे. उर्वरित राजकीय पक्षांना कोणतीही विचारधारा नाही, असा घणाघातही नड्डा यांनी केला आहे.

याआधीही जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. हिमाचलच्या कुल्लूमध्ये बोलतानाही त्यांनी काँग्रेसवर टीका केली. मागच्या 70 वर्षात जे काम झालं नाही ते मागच्या नऊ वर्षात झालं आहे, असं नड्डा म्हणालेत.

ज्या व्यक्तीची आजी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली होती. लोकशाहीचा आवाज दाबला होता. ती व्यक्ती आपल्या परदेश दौऱ्यामध्ये, भारतविरोधी लोकांच्या भेटीदरम्यान लोकशाही धोक्यात असल्याचं म्हणत आहे, असंही टीकास्त्र नड्डा यांनी डागलंय.

जे पी नड्डा यांनी ट्विटरवर फोटो शेअर केलेत. यात त्यांनी मोदी सरकारच्या कार्याचा आढावा घेतला आहे. तसंच भविष्यातील योजनांचाही आढावा घेतला आहे. “आज महा-जनसंपर्क अभियान पंजाब के होशियारपूरमध्ये आयोजित जनसभेला संबोधित केलं. आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागच्या 9 वर्षांमध्ये गरीब कल्याण करण्याच्या दिशेने ऐतिहासिक कार्य केलं जात आहे. या ‘अमृतकाल’मध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान आवश्यक आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश करण्याचं मोदीजींचं लक्ष आहे. त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे”, असं नड्डा आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.