AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांनी हे ध्यानात घ्यावं की इंदिरा गांधी यांनीच…; जे पी नड्डा यांचा घणाघात

J P Nadda On Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यावर टीका करताना जे पी नड्डा यांच्याकडून इंदिरा गांधींचा दाखला; म्हणाले...

राहुल गांधी यांनी हे ध्यानात घ्यावं की इंदिरा गांधी यांनीच...; जे पी नड्डा यांचा घणाघात
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 15, 2023 | 8:23 AM
Share

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी हे लक्षात ठेवावं की, त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनीच देशात आणीबाणी लादली होती, असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त भाजपचं मेगा जनसंपर्क अभियान सुरू आहे. त्यासाठी पंजाबमधील होशियारपूरमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे बोलताना नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यादरम्यान केलेल्या वक्तव्यांवर जे पी नड्डा यांनी टीका केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात भारताची प्रतिमा उंचावत असताना ‘काँग्रेसचे युवराज’ राहुल गांधी देशाची प्रतिमा डागाळत आहेत, असाही घणाघात जे पी नड्डा यांनी केला आहे.

केवळ भाजप हाच विचारधारेवर आणि कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष आहे. उर्वरित राजकीय पक्षांना कोणतीही विचारधारा नाही, असा घणाघातही नड्डा यांनी केला आहे.

याआधीही जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. हिमाचलच्या कुल्लूमध्ये बोलतानाही त्यांनी काँग्रेसवर टीका केली. मागच्या 70 वर्षात जे काम झालं नाही ते मागच्या नऊ वर्षात झालं आहे, असं नड्डा म्हणालेत.

ज्या व्यक्तीची आजी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली होती. लोकशाहीचा आवाज दाबला होता. ती व्यक्ती आपल्या परदेश दौऱ्यामध्ये, भारतविरोधी लोकांच्या भेटीदरम्यान लोकशाही धोक्यात असल्याचं म्हणत आहे, असंही टीकास्त्र नड्डा यांनी डागलंय.

जे पी नड्डा यांनी ट्विटरवर फोटो शेअर केलेत. यात त्यांनी मोदी सरकारच्या कार्याचा आढावा घेतला आहे. तसंच भविष्यातील योजनांचाही आढावा घेतला आहे. “आज महा-जनसंपर्क अभियान पंजाब के होशियारपूरमध्ये आयोजित जनसभेला संबोधित केलं. आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागच्या 9 वर्षांमध्ये गरीब कल्याण करण्याच्या दिशेने ऐतिहासिक कार्य केलं जात आहे. या ‘अमृतकाल’मध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान आवश्यक आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश करण्याचं मोदीजींचं लक्ष आहे. त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे”, असं नड्डा आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...