AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी खरं तर ‘सरेंडर’ मोदी, राहुल गांधी यांचा निशाणा

राहुल गांधी यांनी शनिवारीही पंतप्रधानांवर चिनी आक्रमणास 'शरण गेल्याचा' आरोप केला होता (Rahul Gandhi Criticizes Narendra Modi as Surrender Modi)

नरेंद्र मोदी खरं तर 'सरेंडर' मोदी, राहुल गांधी यांचा निशाणा
| Updated on: Jun 21, 2020 | 1:13 PM
Share

नवी दिल्ली : चीनबरोबर वाढत्या तणावाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल चढवला. मोदींनी बीजिंगला ‘शरण’ गेल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी हे खरं तर ‘सरेंडर’ मोदी आहेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी टीका केली. (Rahul Gandhi Criticizes Narendra Modi as Surrender Modi)

‘जपान टाईम्स’मधील एका लेखाची लिंक शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘नरेंद्र मोदी हे खरं तर सुरेंदर मोदी आहेत’ असे राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले आहे. नरेंद्र या नावाशी साधर्म्य असलेले ‘सुरेंदर’ (Surender) असे नाव त्यांनी लिहिले असले, तरी सरेंडर (Surrender किंवा शरणागती) या अर्थाने ते लिहिल्याचे बोलले जाते. ‘चीनबाबत भारताचे तुष्टीकरण धोरण उलगडले’ या विषयावर ‘जपान टाईम्स’मध्ये लेख आहे.

(Rahul Gandhi Criticizes Narendra Modi as Surrender Modi)

राहुल गांधी यांनी शनिवारीही पंतप्रधानांवर चिनी आक्रमणास ‘शरण गेल्याचा’ आरोप केला होता. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर राहुल गांधी यांनी टीकेची झोड उठवली होती. चीनने भारताच्या जमिनीवर घुसखोरी केली नसल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत केला होता. गलवानच्या खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले.

हेही वाचा : गलवान खोऱ्यात चिनी घुसखोरीवरुन काँग्रेसचे प्रश्न, पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्टीकरण

पंतप्रधानांनी चीनच्या आक्रमकतेनंतर भारतीय भूमी सोपवली. जर चीनची ती भूमी असेल, तर आपले जवान कसे शहीद झाले? आणि हे जवान कुठे शहीद झाले? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते.

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा विपर्यास करुन, त्यांची विधाने मोडतोड करुन आरोप केले जात आहेत, असं पीएमओने त्यानंतर स्पष्ट केलं.  लाईन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोल (LAC) वर भारतीय सैन्याच्या 16 बिहार रेजिमेंटच्या जवानांनी चीनचा डाव उधळून लावला. त्यामुळेच चीनला आपल्या सीमेत घुसता आलं नाही, असंही पीएमओने स्पष्ट केलं. (Rahul Gandhi Criticizes Narendra Modi as Surrender Modi)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.