AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ, धमक्या आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी जोर धरत होती. आता पोलिसांनी या मागणीची दखल घेत त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ केली आहे. पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आलं आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ, धमक्या आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर
गुन्हे दाखल झालेले कार्यकर्ते राज्य ठाकरेंच्या भेटीलाImage Credit source: tv9
| Updated on: May 13, 2022 | 5:33 PM
Share

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात राज ठाकरेंना धमक्या (Raj Thackeray Threat) आल्या होत्या. तशी तक्रारही मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानंतर राज ठाकरेंच्या सुरक्षेत (Mumbai Police) वाढ करण्याची मागणी जोर धरत होती. आता पोलिसांनी या मागणीची दखल घेत त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ केली आहे. पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे हे नाव राज्याच्या राजकारणात धुडगूस घालत आहे. गुढी पाडव्याच्या सभेतून राज ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाची भूमिका उचलून धर मशीदीवरील भोंग्याविरोधात रणशिंग फुंकले. त्यानंतर अनेक राजकीय आरोपही झाले. काही संघटनांचा राज ठाकरेंना काडकडून विरोधही झाला तर अलिकडेच राज ठाकरे आणि बाळा नांदगावकरांना धमकी आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

कशी असेल राज ठाकरे यांची सुरक्षा?

  1. सुरक्षेचा दर्जा पूर्वीचच ( Y +) आहे, मात्र पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आलीय.
  2. आता राज ठाकरेंच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार वाढवला आहे.
  3. भोंगा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते.
  4. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नुकतीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. राज ठाकरेंची पोलीस सुरक्षा वाढवण्याची मागणी त्यांनी केली होती.
  5. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य पाहाता सुरक्षेतील पोलीस कर्मचारी संख्येत करण्यात वाढ आली आहे .

राज ठाकरेंच्या सुरक्षेवरून अनेक राजकीय प्रतिक्रिया

राज ठाकरे यांच्या सुरक्षेवरून अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. राज ठाकरेंच्या जीवाला धोका आहे, असे मला वाटत नाही, मात्र त्यांना जर भिती वाटत असेल तर संरक्षण द्यायला काही हरकत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री जयंत पाटील यांनी दिली होती.  तसेच शिवसेना आणि मनसेतही राज ठाकरेंच्या सुरक्षेवरून जुंपली होती. तर हिंदू परिषदेच्या मिलिंद एकबोटे यांनीही राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मुंबई पोलीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत त्यांची सुरक्षा वाढवली आहे. त्यामुळे आता तरी हा वाद संपेल ही अपेक्षा आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.