AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Shetty : मुख्यमंत्री किती दिवस जबाबदारी झटकणार? राजू शेट्टींचा सवाल; ऊस प्रश्नावर उद्धव ठाकरेंवर निशाणा

Raju Shetty on Uddhav Thackeray : तुम्ही बाळासाहेब थोरात आणि पवारांकडे जर हे विषय सोपवणार असाल तर कसे होणार? ते दोघेही कारखानदार आहेत ते सोयीप्रमाणे निर्णय घेतील, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केलाय. ते आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

Raju Shetty : मुख्यमंत्री किती दिवस जबाबदारी झटकणार? राजू शेट्टींचा सवाल; ऊस प्रश्नावर उद्धव ठाकरेंवर निशाणा
ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांवर टीकाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 04, 2022 | 4:34 PM
Share

सोलापूर : राज्यात हंगाम संपत आला तरी अतिरिक्त उसाचा प्रश्न (Sugar Cane Issue) अद्याप सुटलेला नाही. राज्यात अनेक भागात अजूनही ऊस फडात उभा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केलीय. ‘अडीच वर्षे झाले मुख्यमंत्री होऊन तुम्ही किती दिवस जबाबदारी झटकणार आहात. तुम्ही बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि पवारांकडे जर हे विषय सोपवणार असाल तर कसे होणार? ते दोघेही कारखानदार आहेत ते सोयीप्रमाणे निर्णय घेतील, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केलाय. ते आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले की, बियाणे कंपन्यांनी किती उत्पादन केले आणि गरज किती आहे? रासायनिक खते आणि बी बियाणे याबाबत मुख्यमंत्र्यांनी काय आणि कसा आढावा घेतला हे माहिती नाही. शेतकऱ्यांची शेती करावी की नाही हे सांगावं. साखर परिषद थाटामाटात सुरु आहे पण शेतकरी कुठे दिसतो का? असा सवालही शेट्टी यांनी केलाय. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक केली, 20 हजाराची खंडणी घेतली. पण शेतकऱ्यांना काय दिलं? महाराष्ट्रातील एकूण कारखान्यांची गाळप क्षमता आणि प्रत्यक्ष ऊस याचे गणित केले असते तर 30 – 40 कारखाने सरकारनं ताब्यात घेऊन चालवायला दिले असते तर उसाचा प्रश्न जाणवला नसता, असं शेट्टी म्हणाले. तसंच अतिरिक्त ऊसाचे अपयश सरकार झटकू शकत नाही. पुणताब्यांच्या मागण्या या कृषी मंत्र्यांच्या लेव्हलवर संपण्यासारखं नव्हतं. मात्र, कृषीमंत्र्यांनी काय आश्वासनं दिली माहिती नाही. खत तुटवड्याला राज्य सरकार नव्हे तर केंद्र सरकार जबाबदार आहे, असंही शेट्टी यांनी म्हटलंय.

नीरा उजवा लाभक्षेत्रातील पाणी इंदापूर, बारामतीला नेणं किती योग्य?

राज्यसभेवर सुरु असलेला घोडेबाजार मी पाहतोय. राजकारण किती खालच्या स्तराला गेलं आहे हे मी पहिल्यांदा पाहतोय. विधान परिषदेसाठी मी इच्छूक नाही. लोकांना जर वाटत असेल की मी सभागृहात मी जावे तर त्यांनी वर्गणी काढून मला निवडून द्यावं. मंगळवेढ्यातील 35 गावच्या योजना, दहिगाव, सीना, माढा, अक्कलकोट, बार्शी यासह विविध योजना अर्धवट आहेत. या योजना पूर्ण झाल्या असत्या तर उजनीत थेंबभर पाणी राहिलं नसतं. पालकमंत्री भरणे यांनी नीरा उजवा लाभक्षेत्रातील पाणी इंदापूर, बारामतीला नेणं कितपत योग्य आहे. दुष्काळात होरपळणारा सोलापूर जिल्हा हिरवागार झाला असता. मागील दोन तीन दशके सोलापूर जिल्हा मागे उभा राहिला त्यांना पाणी न देणं हे दुर्दैवी असा टोला, शेट्टी यांनी पवारांवर लगावलाय.

राजू शेट्टींचा शरद पवारांवर घणाघात

नितीन गडकरी यांनी साखर उद्योगाबाबत बोलले असावेत. गडकरींनी इथेनॉलबाबत ठोस भूमिका घेतली. साखर निर्यात झाली नसती तर फार मोठी अडचण आली असती. 20 टक्के साखर उत्पादन कमी झाले. मात्र इथेनॉलचे प्रमाण वाढले. शरद पवारांनी गडकरींचे कौतुक करावे. मात्र, पवारांनी लक्षात घ्यावे की ते 10 वर्षे कृषीमंत्री होते. मग त्यांना या गोष्टी का राबवता आल्या नाहीत याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. नाबार्डमधून साखर उद्योगाला पतपुरवठा का केला नाही. कारण त्यामुळे साखर उद्योगाला 3 टक्क्यात कर्ज उपलब्ध झाले असते. मात्र, पवारांनी तसं केलं नाही. कारण त्यांना जिल्हा बँकेतील आपली बांगडुळे पोसायची होती, असा घणाघातही शेट्टी यांनी केलाय.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.