AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर, कारण काय, किती वेळात लागणार निकाल?

5 वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, अद्याप मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. त्याला भाजप आणि महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांमुळे मतमोजणीला उशीर होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर, कारण काय, किती वेळात लागणार निकाल?
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jun 10, 2022 | 5:58 PM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणुकीचं (Rajya Sabha Election) मतदान आज पार पडलं. राज्यातील 6 जागांसाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळालं. मतदान पूर्ण झालं असलं तरी मतमोजणीला विलंब झाल्याचं पाहायला मिळत आहे. 5 वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, अद्याप मतमोजणीला (Counting) सुरुवात झालेली नाही. त्याला भाजप आणि महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांमुळे मतमोजणीला उशीर होत असल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या आक्षेपांवर निर्णय घेईल आणि त्यानंतरच मतमोजणी होईल, असं सांगण्यात येत आहे.

कधी लागणार निकाल?

मतदानानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. मात्र, भाजपकडून दोन तर महाविकास आघाडीकडून एक आक्षेप नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या आक्षेपावर निर्णय दिल्यानंतरच मतमोजणीची प्रक्रिया सुरु होईल असं सांगण्यात येत आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर साधारण सव्वा तासात निकास स्पष्ट होईल, असंही सांगण्यात येत आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निर्णय आल्याशिवाय मतमोजणीला सुरुवात होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

आक्षेपाचं राजकारण

जितेंद्र आव्हाड यांनी जयत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली. तर यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका एजंटला दाखवली. त्यांमुळे ही दोन्ही मतं बाद करावीत अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, पिठासीन अधिकाऱ्यांनी भाजपची ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आधीच घोडेबाजाराचे आरोप होत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत. त्यांना मतदानाला परवानगी देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे एका एका मतासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं आज पाहायला मिळालं. त्यानंतर काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका बावनकुळे आणि शेलारांकडे दिल्याचा आरोप अमर राजूरकर यांनी केलाय.

गुलाल उधळणार का? मुख्यमंत्री म्हणतात, ऑफकोर्स…

मुख्यमंत्री मतदानावेळी विधान भवनात ठाण मांडून होते. दुपारी साडे तीनच्या सुमारास मुख्यमंत्री विधान भवनातून निघाले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना एक पार्टी नक्की म्हणायची का? असा प्रश्न केला. तेव्हा मला घरी जाऊन येऊ द्या. संध्याकाळी येतोच असं उत्तर त्यांनी दिलं. तर एका पत्रकाराने विजयाचा गुलाल उधळणार का? असं विचारलं असता ऑफकोर्स असं उत्स्फुर्त उत्तर त्यांनी दिलं.

Follow Us
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?