AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर, कारण काय, किती वेळात लागणार निकाल?

5 वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, अद्याप मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. त्याला भाजप आणि महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांमुळे मतमोजणीला उशीर होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर, कारण काय, किती वेळात लागणार निकाल?
| Updated on: Jun 10, 2022 | 5:58 PM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणुकीचं (Rajya Sabha Election) मतदान आज पार पडलं. राज्यातील 6 जागांसाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळालं. मतदान पूर्ण झालं असलं तरी मतमोजणीला विलंब झाल्याचं पाहायला मिळत आहे. 5 वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, अद्याप मतमोजणीला (Counting) सुरुवात झालेली नाही. त्याला भाजप आणि महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांमुळे मतमोजणीला उशीर होत असल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या आक्षेपांवर निर्णय घेईल आणि त्यानंतरच मतमोजणी होईल, असं सांगण्यात येत आहे.

कधी लागणार निकाल?

मतदानानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. मात्र, भाजपकडून दोन तर महाविकास आघाडीकडून एक आक्षेप नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या आक्षेपावर निर्णय दिल्यानंतरच मतमोजणीची प्रक्रिया सुरु होईल असं सांगण्यात येत आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर साधारण सव्वा तासात निकास स्पष्ट होईल, असंही सांगण्यात येत आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निर्णय आल्याशिवाय मतमोजणीला सुरुवात होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

आक्षेपाचं राजकारण

जितेंद्र आव्हाड यांनी जयत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली. तर यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका एजंटला दाखवली. त्यांमुळे ही दोन्ही मतं बाद करावीत अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, पिठासीन अधिकाऱ्यांनी भाजपची ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आधीच घोडेबाजाराचे आरोप होत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत. त्यांना मतदानाला परवानगी देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे एका एका मतासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं आज पाहायला मिळालं. त्यानंतर काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका बावनकुळे आणि शेलारांकडे दिल्याचा आरोप अमर राजूरकर यांनी केलाय.

गुलाल उधळणार का? मुख्यमंत्री म्हणतात, ऑफकोर्स…

मुख्यमंत्री मतदानावेळी विधान भवनात ठाण मांडून होते. दुपारी साडे तीनच्या सुमारास मुख्यमंत्री विधान भवनातून निघाले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना एक पार्टी नक्की म्हणायची का? असा प्रश्न केला. तेव्हा मला घरी जाऊन येऊ द्या. संध्याकाळी येतोच असं उत्तर त्यांनी दिलं. तर एका पत्रकाराने विजयाचा गुलाल उधळणार का? असं विचारलं असता ऑफकोर्स असं उत्स्फुर्त उत्तर त्यांनी दिलं.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.