AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022 : दोन्ही बाजूला गुलाल तयार, पण उधळणार कोण? रोहित पवार आणि सदाभाऊ खोतांपैकी कुणाचा दावा खरा ठरणार?

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) मतदान सुरु आहे. 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे यंदाच्या राज्यसभा निवडणुकीचा फड अधिक रंगलेला पाहायला मिळाला. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते आणि भाजप नेत्यांकडूनही विजयाचा दावा केला जातोय. त्यातच मतदानावेळीही राजकारण पाहायला मिळालं. दोन्ही बाजूंनी काही आमदारांच्या मतांवर आक्षेप नोंदवण्यात आला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार […]

Rajya Sabha Election 2022 : दोन्ही बाजूला गुलाल तयार, पण उधळणार कोण? रोहित पवार आणि सदाभाऊ खोतांपैकी कुणाचा दावा खरा ठरणार?
सदाभाऊ खोत, रोहित पवारImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jun 10, 2022 | 5:22 PM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) मतदान सुरु आहे. 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे यंदाच्या राज्यसभा निवडणुकीचा फड अधिक रंगलेला पाहायला मिळाला. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते आणि भाजप नेत्यांकडूनही विजयाचा दावा केला जातोय. त्यातच मतदानावेळीही राजकारण पाहायला मिळालं. दोन्ही बाजूंनी काही आमदारांच्या मतांवर आक्षेप नोंदवण्यात आला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विजयाचा दावा केलाय. तर भाजपचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी धनंजय महाडिक यांचा विजय निश्चित असल्याचं म्हटलंय. इतकंच नाही तर दोन्ही बाजूला गुलाल तयार आहे. पण उधळणार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे.

कार्यकर्त्यांनी गुलाल तयार ठेवलाय – रोहित पवार

रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना कार्यकर्त्यांनी गुलाल तयार ठेवलाय. मी आता तिकडेच निघालो आहे. आमदार उमेदवार विजयी होतील. आमचा आमच्या आमदारांवर विश्वास आहे. अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. आमच्या विजय निश्चित पाहायला मिळेल. भाजप कशाच्या जोरावर विजयाचा दावा करत आहे माहिती नाही. आमचेच उमेदवार विजयी होतील, असं रोहित पवार म्हणाले. तर नवाब मलिकांवरचा आरोप सिद्ध झालेला नाही. त्यांना मताचा अधिकार मिळेल असं वाटलं मात्र तसं झालं नाही. आमचा न्यायपालिकेकडून अपेक्षा होती, असंही रोहित पवार म्हणाले.

महाडिकांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच विजय निश्चित – खोत

दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हे दुपारी भाजप कार्यालयात पोहोचले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तीन खासदारांना दिल्लीत पाठवून चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचं गिफ्ट देणार. सेना हरणार आणि भाजप जिंकणार. कितीही आदळआपट करा, विजय आमचाच, असा दावा खोत यांनी केलाय. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विजय निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलंय. फक्त तो किती मतांनी ते लवकरच कळेल, असा दावाही त्यांनी केलाय. ज्या दिवशी धनंजय महाडिक यांचा अर्ज भरला त्याच दिवशी आम्ही गुलाल तयार ठेवला, असंही खोत म्हणाले. तर नवाब मलिक यांच्याबाबत कोर्टाचा निर्णय अंतिम असल्याचंही खोत यावेळी म्हणाले.

आक्षेपांचं राजकारण

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्यावेळी भाजपकडून महाविकास आघाडीच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला. भाजप आमदार पराग अळवणी यांनी जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतावर आक्षेप घेतला. तर काँग्रेसच्या अमर राजूरकर यांच्याकडून भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे.

Follow Us
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश