AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022: धूरंदर, राजस्थानच्या राज्यसभा निवडणुकीत गहलोतांनी ते केलं ज्याचा भाजपानं विचारही केला नाही, वाच काय घडलं?

मुख्यमंत्री गहलोत म्हणाले की निवडणुकीत भाजपला चारी मुंड्या चित्त करणार. भाजपकडून त्यांचेच नेते सांभाळले जात नाहीत. अन वरून बाहेरच्या लोकांना बोलवत आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत.

Rajya Sabha Election 2022: धूरंदर, राजस्थानच्या राज्यसभा निवडणुकीत गहलोतांनी ते केलं ज्याचा भाजपानं विचारही केला नाही, वाच काय घडलं?
Ashok GehlotImage Credit source: Tv9
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Edited By: sagar joshi | Updated on: Jun 10, 2022 | 2:37 PM
Share

जयपूर – राजस्थानमध्ये राज्यसभा निवडणूक 2022(Rajya Sabha Election 2022) साठी मतदान सुरु आहे. याच वेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Chief Minister Ashok Gehlot) यांनी आपल्या राजकीय रणनीतीने भाजपाला धक्का दिला आहे . तर झाले असे की आज मतदान सुरु झाल्यांनंतर मुख्यमंत्री गहलोत यांनी भाजपला कल्पनाही करता येणार नाही अशी बाजी खेळली. मतदानाला सुरुवात झाल्या झाल्या त्यांनी पाहिल्यांदा बसपाच्या त्या सहा आमदारांचे प्रथम मतदान करून घेतले. जे सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) जाणार होते.मात्र त्याच्या या खेळीची भनक देखील भाजपाला लागली नाही. यावर माध्यमांशी बोलताना गहलोत म्हणाले की आमच्या नियोजनात या गोष्टीचा समावेश होता. राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. चारपैकी चौथ्या जागेसाठी सर्वात जास्त चुरस इथे पहायला मिळत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

प्रामुख्याने बसपा पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या आमदारांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत हे प्रकरण उच्च न्यायालयातही मांडण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्यानंतर हे नेते सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार होती.मात्र त्यापूर्वी बसपाचे सहा आमदार विधानसभेत मतदान करतील, असे ठरले होते. तश्या सूचनाही या आमदारांना देण्यात आल्या होत्या.विशेष म्हणजे या आमदारांनी मतदानासाठी सज्ज राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून दिल्या गेल्या होत्या.

असे केले मतदान

प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर प्रथम मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी मतदान केले. त्यानंतर लगेच बसपाच्या या सहा नेत्यांनी मतदान केले. आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात आला तरी त्यांच्या मताचा निवडणुकीत विचार केला जाईल. यावर बोलताना मुख्यमंत्री गहलोत म्हणाले की निवडणुकीत भाजपात चारी मुंड्या चित्त करणार भाजपकडून त्यांचेच नेते सांभाळले जात नाहीत. अन वरून बाहेरच्या लोकांना बोलवत आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. चारपैकी चौथ्या जागेसाठी सर्वात जास्त चुरस इथे पहायला मिळत आहे.

Follow Us
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट