AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनला युद्ध हवे असल्यास भारत तयार, आठवले आक्रमक, चायनीज फूडवर बहिष्काराचे आवाहन

चिनी खाद्यपदार्थ व चिनी पदार्थांची हॉटेल्स भारतात बंद केली पाहिजेत!" अशी मागणी रामदास आठवले यांनी 'टीव्ही9 मराठी'शी बोलताना केली. (Ramdas Athawale appeals to boycott Chinese Food)

चीनला युद्ध हवे असल्यास भारत तयार, आठवले आक्रमक, चायनीज फूडवर बहिष्काराचे आवाहन
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jun 18, 2020 | 12:54 PM
Share

नवी दिल्ली : भारताला युद्ध नाही, बुद्ध पाहिजे. पण चीनला युद्ध हवे असल्यास भारत तयार आहे, असं म्हणत रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दंड थोपटले. चायनीज फूडवर बहिष्कार घातला पाहिजे, असे आवाहनही आठवले यांनी केले. (Ramdas Athawale appeals to boycott Chinese Food)

“चीन हा एक कपट करणारा देश आहे. भारताने सर्व चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे. चिनी खाद्यपदार्थ व चिनी पदार्थांची हॉटेल्स भारतात बंद केली पाहिजेत!” अशी मागणी रामदास आठवले यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना केली.

“भारताने चीनला बुद्ध दिला आहे, युद्ध दिलेले नाही. पण चीनला युद्धाची खुमखुमी असेल, तर भारतीय सैन्य चीनला कायमचा धडा शिकवतील. भारतात कोरोनाशी युद्ध सुरु आहे. त्यामुळे आता आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. ‘कोरोना’शी सुरु असलेले युद्ध जिंकणार आहोत आणि वेळ आल्यास चीनशीही युद्ध जिंकू” असं आठवले म्हणाले.

हेही वाचा : Boycott Chinese Equipment : चीनला आर्थिक झटका देण्याची तयारी, BSNL चिनी उपकरणांचा वापर बंद करण्याची चिन्हं

(Ramdas Athawale appeals to boycott Chinese Food)

गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात शहीद जवानांना रामदास आठवले यांनी श्रद्धांजली अर्पण केली. “लडाखच्या गलवानमध्ये भारतीय सीमेवर चीनसोबत झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना विनम्र श्रद्धांजली! जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही. भारत सरकार आणि सर्व भारतीय शहीद जवानांच्या कुटुंबीयांसमवेत उभे आहेत!” अशा शब्दात आठवले यांनी आदरांजली व्यक्त केली.

काँग्रेसला सत्तेबाहेर पडण्याचा सल्ला

काँग्रेस पक्षाला विश्वासात घेऊन निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे काँग्रेसने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला. (Ramdas Athawale appeals to boycott Chinese Food)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक