AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींना ‘हम दो हमारे दो’ म्हणायचं असेल तर आधी लग्न करावं लागेल : रामदास आठवले

रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध केल्याच्या मुद्द्यावर राहुल गांधींवर खोचक टीका केलीय.

राहुल गांधींना 'हम दो हमारे दो' म्हणायचं असेल तर आधी लग्न करावं लागेल : रामदास आठवले
| Updated on: Feb 21, 2021 | 5:44 PM
Share

नवी मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध केल्याच्या मुद्द्यावर राहुल गांधींवर खोचक टीका केलीय. नवे कृषी कायदे दोन उद्योगपतीचे आहेत हे म्हणत राहुल गांधींनी हम दो हमारे दो अशी टीका केली होती. याला उत्तर देताना रामदास आठवले यांनी राहुल गांधींना हम दो, हमारे दो म्हणण्यासाठी आधी लग्न करावं लागेल, अशी खोचक टीका केलीय. ते वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, “मोदी सरकारने नवे कृषी कायदे अदानी आणि अंबानींसाठी आणल्याची टीका होते. मात्र, ती अत्यंत चुकीची आहे. त्यांना नफा कमवायला अनेक दुसरे उद्योग आहे. त्यांना शेतीवर उद्योग करायचे आहेत असं नाही. राहुल गांधी म्हणतात की ‘हम दो, हमारे दो’. राहुल गांधींना असं म्हणण्यासाठी लग्न करावं लागेल. हम दो, हमारे दो असा आरोप करण्यात काहीही तथ्य नाही. हा कायदा चांगला आहे.”

“काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाच्या शूटिंग होऊ देणार नाही असं म्हटलंय. महाराष्ट्रात गुंडाराज नाही. तुम्ही असं विधान करू शकत नाही. तुम्ही अभिनेत्यांच्या चित्रपटाचे शूटिंग बंद करण्याचा प्रयत्न केला, तर रिपब्लिकन पक्ष आणि कार्यकर्ते त्यांच्या सुरक्षेसाठी पुढे येतील. मी लवकरात लवकर अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी स्वतः जाणार आहे.”

‘नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला 25 जागा मिळाव्यात’

रामदास आठवले म्हणाले, “आगामी सर्व महापालिका निवडणुकीत आरपीआय भाजप बरोबरच युती करणार आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला 25 जागा मिळाल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. तसा प्रस्ताव आम्ही भाजपकडे ठेवला आहे. शेवटी आम्हाला 6 ते 7 जागा मिळाल्या पाहिजे, अशी अपेक्षा करतो. आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार हे कायमस्वरूपी चिन्ह नसल्यामुळे भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढवतील.”

आमदार गणेश नाईक यांच्या इंटरनॅशनल डॉन या वक्तव्यावर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले, “मी नाईकांना ओळखतो. गणेश नाईक यांचे कोणत्याही डॉन सोबत संबंध नाही.”

हेही वाचा :

आधी पटोलेंच्या भूमिकेला विरोध, आता रामदास आठवले थेट बिग बींची भेट घेणार

अमिताभ बच्चन के सन्मान मे आरपीआय मैदान में, नाना पटोलेंच्या धमकीला भीक घालत नाही: रामदास आठवले

शरद पवारांच्या त्या गंभीर आरोपांना रामदास आठवले यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे!

व्हिडीओ पाहा : 

Ramdas Athawale criticize Rahul Gandhi over Ham do Hamare do remark about Farm laws

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.