AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांच्या त्या गंभीर आरोपांना रामदास आठवले यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे!

प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यालरील हल्ला भाजपने घडवून आणला यात तथ्य नाही, असं प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी शरद पवार यांना दिलं आहे. | Ramdas Athawale

शरद पवारांच्या त्या गंभीर आरोपांना रामदास आठवले यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे!
रामदास आठवले आणि शरद पवार
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Feb 14, 2021 | 10:07 AM
Share

अहमदनगर : प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात बोलताना केला. त्यांच्या या आरोपाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांच्या म्हणण्यात कसलंही तथ्य नाही, असं ते म्हणालेत. (Ramdas Athawale reply Sharad pawar over red Fort Violence)

शरद पवारांच्या म्हणण्यात तथ्य नाही

26 जानेवारीला दिल्लीतील हल्ला भाजपने घडवून आणला यात तथ्य नाही. प्रजासत्ताक दिनी पोलिसांनी आंदोलनाला परवानगी द्यायला नको होती मात्र दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली. त्यामध्ये शेतकरी आंदोलनामध्ये कुणी आतंकवाद्यांनी शिरुन हल्ला केला. शरद पवार जुने जाणते आहेत. या प्रकणाची चौकशी व्हावी म्हणजे सत्य बाहेर येईल, असं ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी लग्न करावं आणि मग बोलावं, ‘हम दो हमारे दो…’

‘हे सरकार म्हणजे हम दो हमारे दो आहे’, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आठवले यांनी उत्तर दिलं. राहुल गांधींनी लग्न करायला पाहिजे त्याशिवाय त्यांचं हम दो हमारे दो होणार नाही, असा टोलाही आठवले यांनी लगावला. तसंच राहुल गांधी यांनी मोदींवर केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही कारण अंदानी आणि अंबानी यांना मोठं करण्याची गरज नाही ते आधीपासूनच आर्थिक दृष्ट्या मोठे आहेत, असा टोलाही त्यांनी राहुल गांधींना लगावला.

पूजा चव्हाण प्रकरणाची पुणे पोलिसांनी कसून तपास करावा

मूळची परळीची असलेली पुणे स्थित तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येने राज्यात खळबळ माजली आहे. राज्य सरकारमधील एका बड्या मंत्र्याच्या भोवती संशयाची सुई आहे, असा आरोप भाजपने केला आहे. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, “पुण्यातील पूजा चव्हाण प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची शहानिशा झाली पाहिजे. पुणे पोलिसांनी चौकशी करावी”

राज्यपालांना सरकारी विमान नाकारणं हा तर राज्याचा अपमान

हा राज्यपालांचा अपमान नाही तर राज्याचा अपमान आहे. ते यूपीएससी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमासाठी देहरादूनला जात होते. त्यांना विमानातून खाली उतरवणं हा राज्याचा अपमान आहे. राज्याची राजनीती नीतीवर आधारलेली आहे. बारा आमदार नियुक्ती बाबत मुंबई हाय कोर्टामध्ये रिट पिटीशन दाखल आहे त्याचा निकाल लागल्यानंतर आमदार नियुक्त होतील, असंही त्यांनी सांगितलं.

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते ज्यावर आठवलेंनी प्रत्युत्तर दिलंय…?

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घातला गेला याबद्दल आम्ही जरा खोलात जाऊन माहिती घेतली. त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असं मोठं आणि तितकंच गंभीर वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

हे ही वाचा :

मंत्र्याला हाकला, घरी पाठवा; चौकशी होत राहील; पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलेश राणे आक्रमक

Video | कोल्हापुरात 50 शेतकऱ्यांचा 60 एकरातील ऊस जळून खाक, लाखोंचं नुकसान

Valentine Day : केवळ एकच दिवस नाही तर प्रत्येक दिवस प्रेमाचा व्हावा म्हणून….!

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक