AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन के सन्मान मे आरपीआय मैदान में, नाना पटोलेंच्या धमकीला भीक घालत नाही: रामदास आठवले

अमिताभ बच्चन तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. (Ramdas Athawale Support Amitabh Bachchan)

अमिताभ बच्चन के सन्मान मे आरपीआय मैदान में, नाना पटोलेंच्या धमकीला भीक घालत नाही: रामदास आठवले
रामदास आठवले, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, नाना पटोले
| Updated on: Feb 20, 2021 | 5:51 PM
Share

पालघर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भूमिकेला विरोध केला आहे. ते पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे बोलत होते. अमिताभ बच्चन तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. (Ramdas Athawale slams Nana Patole over statement on Amitabh Bachchan)

अमिताभ बच्चन तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है

रामदास आठवले यांनी अमिताभ बच्चन यांना पाठिंबा दर्शवत, अमिताभ बच्चन के सन्मान मे आरपीआय मैदान मे, असं म्हटलं. आरपीआयचे कार्यकर्ते जमा होऊन त्यांना अमिताभ बच्चन यांना पाठिंबात देतील. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर दबाव आणला जात असेल तर आरपीआय त्यांना संरक्षण देईल, असं आठवले म्हणाले. नाना पटोले यांनी त्यांची भूमिका बदलावी, असंही त्यांनी आवाहन केले.

आरपीआयचा मोर्चा

महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे महाराष्ट्रामध्ये शूटिंग करू देणार नाही, अशी धमकी दिली होती. आरपीआयनं अमिताभ बच्चन यांचा समर्थनार्थ जुहू जलसा बंगलाच्या समोर मोर्चा काढून अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे समर्थन केले. आरपीयआयच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.

नाना पटोले काय म्हणाले होते?

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचावर टीका केली होती. नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या जुन्या ट्विटची आठवण करुन दिली होती. बच्चन आणि कुमार यांचे सिनेमे व शूटिंग महाराष्ट्रात चालू न देण्याचा इशारा देत ते बंद पाडण्याची ताकीद त्यांनी दिली होती. यानंतर नाना पटोलेंवर भाजपच्या नेत्यांनी टीकास्त्र सोडले होते. नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देत भाजप हे सेलिब्रटीचा वापर करीत असल्याचा आरोप केला. मनमोहन सिंग सरकार कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव जास्त असताना सरकारने पेट्रोल व डिझल चे भाव वाढविले नाही. मात्र, मोदी सरकारच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर कमी असताना सुद्धा मोदी सरकार जनसामान्यांचे खिसे कापण्याचे काम करीत आहे, असा आरोप केला होता.

अभिताभ बच्चन व अक्षय कुमार यांनी मनमोहन सिंग सरकार वर टीका करत थट्टा केली होती. मात्र, ते अभिनेते आज का गप्प आहेत,सेलिब्रेटी हे कुठल्या पक्षाचे नसून जनसामान्यांचे असतात त्याचा वक्तव्याचा जनमानसात प्रभाव पडत असतो. मात्र, ते आज वास्तविकता मांडत असताना दिसत नाहीत, अशा डुप्लिकेट व डबल स्टॅडर्स अभिनेत्यांना धडा शिकविणे हा लोकशाही चा सगळ्यात चांगला मार्ग आहे. हे माझे मत नसून काँग्रेस पक्षाचे मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या: 

ठाकरे सरकारसोबत काँग्रेसचा खळ्ळखट्यॅक होणार, काँग्रेस पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार : रामदास आठवले

अमिताभ बच्चन यांनी विरानुष्काच्या मुलीवर केलं ट्वीट, घराणेशाहीचा आरोप करत नेटकरी भडकले

(Ramdas Athawale slams Nana Patole over statement on Amitabh Bachchan)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.