AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Kadam : स्वतंत्र पक्ष नकोच, मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार, शिंदे गटातील रामदास कदम स्पष्टच म्हणाले..

ज्या दिवशी तुम्ही शरद पवार आणि राष्ट्रवादीला सोडून परत याल, त्या दिवशी तुम्ही आमचे नेते आपोआप व्हाल असेही रामदास कदम म्हणालेत, तर नवा पक्ष नकोच, मी मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार आणि भगव्यातच जाणार, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

Ramdas Kadam : स्वतंत्र पक्ष नकोच, मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार, शिंदे गटातील रामदास कदम स्पष्टच म्हणाले..
ठाकरेंवर रामदास कदमांचे गंभीर आरोप
| Updated on: Jul 29, 2022 | 5:01 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Ekanath Shinde) यांचं बंड झाल्यापासून आणि त्यांच्यासोबत पन्नास आमदार गेल्यापासून एकीकडून आदित्य ठाकरे त्यांना रोज गद्दार म्हणून डिवचत आहेत. तर दुसरीकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांना गद्दार, विश्वासघातकी म्हणून डिवचत आहेत, अशातच शिंदे गटासोबत गेलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांना काही खोचक सवाल केले आहेत. तसेच शरद पवार यांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही सर्व करायला लागला त्यामुळेच असं घडलं. ज्या दिवशी तुम्ही शरद पवार आणि राष्ट्रवादीला सोडून परत याल, त्या दिवशी तुम्ही आमचे नेते आपोआप व्हाल असेही रामदास कदम म्हणालेत, तर नवा पक्ष नकोच, मी मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार आणि भगव्यातच जाणार, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

आधीच भेटला असता तर ही वेळ आलीच नसती

तर उद्धवजींनी या गोष्टींचा स्वतः अभ्यास केला पाहिजे, तुम्ही अडीच वर्षांमध्ये आमदारांना किती भेटलात. खासदारांना किती भेटला ते पाहिलं पाहिजे. त्यांच्या समस्या पण किती सोडवल्या आणि त्यांना का जावं लागलं आणि ते गेले नसते तर त्यातला एक ही आमदार पुन्हा निवडून आला असता का? या सर्व गोष्टींचा उद्धव ठाकरेंनी अभ्यास करून पहावा. ज्या काळात तुम्हाला भेटता येत नव्हतं त्या काळात तुमचा मुलगा लोकांना भेटू शकला असता. त्यांना काय अडचण होती? असा सवाल त्यांनी केला आहे. आज तुम्ही मातोश्रीचे दरवाजे उघडे ठेवले. आता तुम्ही सर्वांना भेटत आहात, अशाच पद्धतीने जर तुम्ही मागच्या अडीच वर्षात भेटला असता तर आज ही वेळ आली नसती, असेही ते म्हणाले आहेत.

शिवसेना संपवण्याचा डाव

तसेच अजित पवार आमच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे आमदाराला सर्व ताकद देऊन शिवसेनेच्या विद्यमान आमदाराला संपवतोय हे सातत्याने अडीच वर्षात जाणवलं, अनिल परबांना हाताशी धरून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला असा आरोप रामदास कदम यांनी पुन्हा केला आहे. शरद पवार पुरस्कृत आपले विचार आहेत, आज आपण राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसला हाच बाळासाहेबांनी तुमच्यातला फरक आहे. या ठिकाणी कोणतीही घराणेशाही येत नाही. तसेच एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार घेऊन चालले आहेत आणि उद्धव ठाकरे पवारांचे विचार घेऊन काम पाहत आहेत असा घणाघातही त्यांनी केला आहे.

तो नगराध्यक्ष सरकारचा जावयी आहे का?

खेड  नगरपरिषदेचा मनसेचा नगराध्यक्ष होता. तो राष्ट्रवादीचं उघडपणे काम करतोय. त्याची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढली. त्यानंतर कायद्याने लवकरात लवकर निर्णय व्हायला हवा होता. तो तिथे शिवसेनेच्या मुळावर उठल्याचेही सांगितलं. पण सरकारने त्याच्यावरती कारवाई केली नाही. तो सरकारचा जावई आहे का? असा सवाल ही रामदास कदम यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी ज्या दिवशी वर्षा निवासस्थान सोडलं त्या दिवशी माझ्याही डोळ्यातून पाणी आलं. मलाही वाईट वाटलं त्याबद्दल कुठेही दुमत नाही. पण तुम्ही शरद पवारांचे मुख्यमंत्री म्हणून खाली उतरला की काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडला. शिवसेनेच्या आणि भगव्या विचारधारा असताना तुम्ही शरद पवारांचं ऐकूण मनसेच्या नगरसेवकाला अभय देताय, म्हणजे आम्ही नेमकं समजायचं काय? असा सवाली त्यांनी केला आहे.

Follow Us
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.