AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raosaheb Danve : येत्या निवडणुकीतही आमचेच सरकार येणार, धनुष्यबाण शिंदेंनाच मिळणार, हीच खरी सेना, रावसाहेब दानवेंचं भाकीत

गेल्या तीन दशकातील भाजप शिवसेनेची युती तुटत राज्यात अडीच वर्षांपूर्वी पहिल्यांदा महाविकास आघाडी स्थापन झाली होती. मात्र आता दानवेंच्या या विधानाने राजकारणाचे पुढची दिशा काय असणार? याचा अंदाज बांधणं कठीण झालंय.

Raosaheb Danve : येत्या निवडणुकीतही आमचेच सरकार येणार, धनुष्यबाण शिंदेंनाच मिळणार, हीच खरी सेना, रावसाहेब दानवेंचं भाकीत
येत्या निवडणुकीतही आमचेच सरकार येणार, धनुष्यबाण शिंदेंनाच मिळणार, हीच खरी सेना, रावसाहेब दावेंचं भाकीतImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jul 22, 2022 | 3:49 PM
Share

नवी दिल्ली : दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन (Assembly Session) सुरू आहे. मात्र दिल्लीतल्या या पावसाळी अधिवेशनातही राजकारणाचा माहोल मात्र गरमागरमीचा पाहायला मिळतोय. तसेच आता भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे.  राज्यात आता भाजप आणि शिवसेनेचे सरकार (BJP Shivsena Alliance) आहे. त्यामुळे पुढच्या वेळेसच्या निवडणुका आम्ही एकत्र लढू, अशी घोषणाच रावसाहेब दानवे यांनी करून टाकली आहे. तसेच पुढच्या वेळेस ही भाजप आणि शिवसेनेचे सरकार निवडून येणार, असेही भाकीत वर्तवून टाकलंय. त्यामुळे पुन्हा नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. गेल्या तीन दशकातील भाजप शिवसेनेची युती तुटत राज्यात अडीच वर्षांपूर्वी पहिल्यांदा महाविकास आघाडी स्थापन झाली होती. मात्र आता दानवेंच्या या विधानाने राजकारणाचे पुढची दिशा काय असणार? याचा अंदाज बांधणं कठीण झालंय.

शिंदे यांनाच धनुष्यबाण चिन्ह मिळेल

दरम्यान ज्यांच्याकडे जास्त संख्या त्याचा पक्ष असतो, त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त आमदारांची संख्या आहे, तसेच जास्त खासदारांची संख्या आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल, असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. तसेच कुठल्याही संधीचा फायदा घेतला नाही, 2019 ला निवडणुका झाल्या तेव्हा सगळ्यांचे म्हणणं होतं की आपण भाजपसोबत युती करावी. ही युती जनतेला मान्य होती, मात्र मनाप्रमाणे मुख्यमंत्री पदासाठी युती केली, त्यामुळेच आज हा दिवस उजाडला असाही टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

अजित पवार यांचं कौतुक

तसेच आताची शिवसेना ही खरी शिवसेना आहे, मतदारांना संभाळणारा आणि विचारणारा नेता नसेल तर ते काय करतील असा सवाल ही दानवे यांनी विचारला आहे. तसेच ती मत फुटली नाहीत त्यांनी सद्विवेक बुद्धीने मतदान केलं. आमचं सरकार चांगलं काम करेल. मात्र चुकीचं काय असेल तर दादांनी ते दाखवून द्यावं, दादांच्या कामाबद्दल वर्णन करणं सोयीचं नाही. मात्र स्वभाव त्यांचा चांगला आहे, असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकामावर रावसाहेब दानवे यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. तर शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसला संपवायचं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना संपवायची होती, हे माहीत नाही. मात्र दोघे एकत्र बसायचे. आता खरी शिवसेना वेगळी झाले, मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मुख्यमंत्री उत्तर देऊ शकतील असे ते म्हणाले.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?