AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : ‘शॉल घेतली म्हणून कुणी बाळासाहेब होत नाही’, रोहित पवारांचा राज ठाकरेंना जोरदार टोला

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावलाय. राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपची आहे. तसंच अंगावर शॉल टाकली म्हणजे कुणी बाळासाहेब होत नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी केलाय.

Rohit Pawar : 'शॉल घेतली म्हणून कुणी बाळासाहेब होत नाही', रोहित पवारांचा राज ठाकरेंना जोरदार टोला
रोहित पवार, राज ठाकरेImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 15, 2022 | 9:06 PM
Share

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याला शिवतीर्थावरील सभा आणि ठाण्यात झालेल्या उत्तर सभेतही राज यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच राज्यात जातीयवाद वाढल्याचा गंभीर आरोप राज यांनी केलाय. राज ठाकरेंच्या आरोपांना खुद्द शरद पवार यांनीही प्रत्युत्तर दिलंय. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावलाय. राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपची आहे. तसंच अंगावर शॉल टाकली म्हणजे कुणी बाळासाहेब होत नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी केलाय.

राज ठाकरे यांचं भाषण आवडायचं, पण…

राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नरेटिव्ह सेट केला जातोय. राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपची आहे. राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करत आहेत. मात्र अंगावर शॉल टाकली म्हणजे बाळासाहेब होत नाही. राज ठाकरे हे चांगले अभिनेते आहेत, ते चांगला अभिनय करत आहेत. मला राज ठाकरे यांचं भाषण आवडायचं. मात्र, आता ते भाजप सागंत आहे तसं करत आहेत. कोणताही नेता पुन्हा घडत नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर सध्या विकासाच्या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही. मात्र, आपण विकासाचे मुद्दे लोकांसमोर घेऊन जाणार असल्याचंही रोहित पवार म्हणाले.

राज ठाकरेंचा पवारांवर जातीवादाचा आरोप

राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीवादाचा गंभीर आरोप केला. देशात हजारो वर्षापासून जात आहे. ‘प्रत्येक व्यक्तीला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता. पण 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला. आमच्या मुलांची माथी भडकावली गेली. शरद पवार सांगतात इतिहास चुकीचा सांगितला गेला. राष्ट्रवादीने संभाजी बी ग्रेड का सी ग्रेड सारख्या संघटना काढल्या. या संघटना 1999 सालानंतर कशा आल्या? हा योगायोगा नाही, त्या त्यांनीच काढल्या’, अशा शब्दात राज यांनी पवारांवर निशाणा साधला होता.

इतर बातम्या :

Raj Thackeray vs NCP : मनसेच्या हनुमान चालीसा पठणाला राष्ट्रवादीचं महाआरतीने उत्तर! जयंत पाटील, सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार, पुणे तापणार?

Sharad Pawar Live : त्यांच्याकडे बोलायला काही नाही, शरद पवारांनी पुन्हा राष्ट्रवादीतल्या ओबीसी, आदिवासी नेत्यांची यादी वाचली, फडणवीस बोलणार?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.