AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फसवणाऱ्यांना दिलासा ! माय लॉर्ड, हे काय ? सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यावरती जोरदार टीका

"महाराष्ट्रात (Maharashtra) एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा ताबा घेतलाच आहे. न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ नयेत, पण काय करणार ? मला न्याय हवा असेल तर मी न्यायालयात जाणार नाही, तेथे न्याय मिळत नाही, असे माझी सर न्यायाधिश रंजन गोगाई (Ranjan Gogoi) यांनी म्हटले आहे.

फसवणाऱ्यांना दिलासा ! माय लॉर्ड, हे काय ? सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यावरती जोरदार टीका
सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यावरती जोरदार टीका Image Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 15, 2022 | 7:18 AM
Share

मुंबई – “महाराष्ट्रात (Maharashtra) एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा ताबा घेतलाच आहे. न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ नयेत, पण काय करणार ? मला न्याय हवा असेल तर मी न्यायालयात जाणार नाही, तेथे न्याय मिळत नाही, असे माझी सर न्यायाधिश रंजन गोगाई (Ranjan Gogoi) यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीशांची ही अवस्था असेल तर सामान्यांचे काय ? विक्रांत युद्धनौकेच्या नावावर पैसे गोळा करून अपहार करणे हा देशद्रोह नाही काय ? माय लॉर्ड, तुम्हीच सांगा !” अशी टीका आजच्या सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून केंद्रीय तपास यंत्रणांवरती करण्यात आली आहे.

विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी जनतेचा पैसा लुटला

विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या या दोघांनी जनतेचा पैसा लुटला आहे. ज्यावेळी त्यांच्यावरती ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी दोघेही फरार झाले होते. कोट्यावधी रूपयांचा अपहार करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन दिल्यानंतर हे सोमय्या पिता-पुत्र पुन्हा प्रकट झाले आहेत. ज्यांच्यावर पैशाचा अपहार केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने त्यांना रोज पोलिस स्टेशनला हजेरी लावयला सांगितली आहे असे हे किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार का ? असा सवाल देखील सामनाच्या अग्रेलखात उपस्थित करण्यात आला आहे.

जमा केलेली रक्कम राजभवनात देऊ असं वचन देण्यात आलं होतं

किरीट सोमय्यांनी विक्रांतच्या नावाखाली जनतेचा पैसा लुटला आहे. त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली जो काही पैसा जमा केला आहे. तो राजभवनात जमा करू असं वचन किरीट सोमय्या यांनी दिले होते. पण जमा केलेली रक्कम मधल्यामधी गायब झाली. राजभवनाने ती रक्कम आमच्याकडे आली नसल्याचे लेखी सांगितले आहे. पण आपले न्यायालय पैशांच्या अपहाराचा हा पुरावा आहे असे मानायला तयार नाही. किरीट सोमय्यांच्या वकीलांनी सांगितले की जमा केलेला पैसा राजभवनात जमा केलेला नाही. आरोपीने हे पैसे भाजपच्या कार्यालयात जमा केले आहेत. भाजपच्या कार्यालयात विक्रांतचा निधी जमा केला व शेकडो लोकांची फसवणूक झाली हे मानायला आमचे न्यायालय तयार नसेल तर आपण कोणत्या युगातून जात आहोत, येणारा काळ किती कठीण आहे, हे लक्षात येईल.

Petrol, diesel price: इंधनाचे भाव कसे कमी होणार?, पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितला उपाय

today Petrol diesel rate : सलग दहाव्या दिवशी इंधनाचे दर स्थिर, मात्र एक्साइज ड्यूटी कमी होणार नसल्याचे संकेत

विमा पॉलिसी खरेदी करून फसला आहात; नको असलेल्या पॉलिसीमधून अशी करा आपली सुटका

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली