AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तेत राहून आंदोलन करायचे, दुसऱ्या बाजूला बारामतीला जाऊन गोड चहा घ्यायचा, सदाभाऊ खोत यांचा घणाघात

हे उद्योग बंद करा," असा इशारा भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी दिला. (Sadabhau Khot Criticism Raju Shetti)  

सत्तेत राहून आंदोलन करायचे, दुसऱ्या बाजूला बारामतीला जाऊन गोड चहा घ्यायचा, सदाभाऊ खोत यांचा घणाघात
Raju Shetti Sadabhau Khot
| Updated on: Jan 11, 2021 | 9:43 PM
Share

ठाणे : एकीकडे सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहून आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस, गोड चहा घ्यायचा, अशी दुटप्पी भूमिका काही पक्षातील नेते करत आहेत. अशी घणाघाती टीका भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली. (Sadabhau Khot Criticism Raju Shetti)

केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्याच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना खोत यांनी शेतकरी नेते राजू शेट्टींवर जोरदार टीका केली.

“लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र शेतकऱ्यासाठी आम्ही काम करतो असे खोट बोलून फक्त आमदारी मिळावी यासाठीचे प्रयत्न दिसून येत आहेत. एकाबाजूला सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला कारखाना मालकांच्या मांडीला मांडी लावून बसायचे. हे उद्योग बंद करा,” असा इशारा भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी दिला.

“सध्याचे सरकार कुचकामी”

“अजून किती दिवस साखरेचा गोड चहा घेत राहणार, किती दिवस आमरस खात राहणार, आता हे सर्व सोडून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे उद्योग बंद करा. सरकारमध्ये असताना उगाचच दिल्लीत आंदोलन कसे काय करता,” असा सवालही सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.

“आमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्याचे प्रश्न सोडवले. तसेच अनेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचे प्रयत्न माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र सध्याचे सरकार कुचकामी असून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही. तसेच यांना शेतकऱ्याचे काही घेणे देणे नाही. फक्त स्वार्थ साधायचा,” अशी टीकाही खोत यांनी केली.

“डोक्यात भ्रम निर्माण केल्यामुळे दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन” 

“केंद्राने केलेल्या आध्यादेशचे रूपांतर आता कायद्यात झाले आहे. त्याबाबत अनेकांनी त्याचे स्वागत केले आहे. तीन कायद्याच्या माध्यमातून बाजारपेठेतून स्वतंत्र मिळाले आहे. या नवीन कायद्यामुळे शेतकरी आणि बाजारपेठांना फायदा होणार आहे. पण काहींनी डोक्यात भ्रम निर्माण केल्यामुळे दिल्ली येथील शेतकरी आंदोलन सुरू आहे.”

“या कायद्यामुळे शेतमालाला हमीभाव मिळू शकतो. तसेच 70 वर्ष जुनाट कायदे शेतकाऱ्यावर लादले. लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याचे उदाहरण डोळ्यासमोर आहे. काँग्रेस आणि काही इतर पक्ष जाणूनबुजून टीका करत आहेत,” असेही सदाभाऊ खोत म्हणाले. (Sadabhau Khot Criticism Raju Shetti)

संबंधित बातम्या : 

राजू शेट्टींना विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ, शेलारांचा जहरी वार

मेंढ्यांच्या कळपाचं नेतृत्व लांडग्यांकडे, गोपीचंद पडळकरांचा वार नेमका कुणावर?

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...