AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1984 ला झालं ते झालं, आत्ताचं बोला, शिख दंगलींवर सॅम पित्रोदांचं वक्तव्य

नवी दिल्ली : काँग्रेसचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा यांच्या शिख दंगलीवरील वक्तव्याने नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. 1984 च्या शिख दंगलींवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, तेव्हा जे झालं ते झालं, ते सोडा तुम्ही (मोदी सरकार) गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगा, असं ते म्हणाले. 1984 चं प्रकरण हा भूतकाळ आहे, […]

1984 ला झालं ते झालं, आत्ताचं बोला, शिख दंगलींवर सॅम पित्रोदांचं वक्तव्य
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा यांच्या शिख दंगलीवरील वक्तव्याने नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. 1984 च्या शिख दंगलींवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, तेव्हा जे झालं ते झालं, ते सोडा तुम्ही (मोदी सरकार) गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगा, असं ते म्हणाले. 1984 चं प्रकरण हा भूतकाळ आहे, आत्ताचं बोला, असं वक्तव्य पित्रोदा यांनी केलं. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे.

पंजाबमधील प्रचारात 1984 ची शिख दंगल हा मुद्दा बनवला जात असून त्याला दिवंगत पंतप्रधान जबाबदार होते, असा भाजपचा आरोप आहे. यावर सॅम पित्रोदा यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर ते म्हणाले, “तुम्ही (सरकार) तर रोज खोटं बोलता, 1984 चं आत्ता काय आलं? तुम्ही पाच वर्षात काय केलं त्याविषयी बोला. 1984 ला जे झालं ते झालं, तुम्ही काय केलं? रोजगार निर्मितीसाठी तुम्हाला मत दिलं, ते तुम्ही केलं नाही. 200 स्मार्ट शहरांसाठी तुम्हाला मतदान मिळालं, पण तेही तुम्ही केलं नाही. तुम्ही काही केलं नाही म्हणून असे मुद्दे उकरुन काढले जात आहेत. थांबवा हे”.

नानावटी आयोगाने शिख दंगलींची चौकशी केली होती, जो भारताचा मोठा नरसंहार होता. लोकांना मारण्याच्या सूचना थेट पंतप्रधान राजीव गांधींच्या कार्यालयातून आल्या होत्या, असा आरोप भाजपने एका ट्वीटच्या माध्यमातून केलाय. यावर आरोप आणि प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर या निवडणुकीत राजीव गांधींच्या नावाची एंट्री झाली. मोदींनी राजीव गांधींना भ्रष्टाचारी नंबर वन असं संबोधलं होतं. त्यानंतर पुन्हा एक आरोप मोदींनी केला. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी युद्धनौका आयएनएस विराटचा वापर कौटुंबीक सुट्टी साजरी करण्यासाठी केला होता, असं मोदी म्हणाले.

VIDEO :

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.