AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात मर्दानगीचा दुष्काळ, खोके सरकारमध्ये जीव नाही, शिंदे सरकारवर कुणाची आगपाखड!

बेळगाव कारवारसह संपूर्ण सीमा भाग महाराष्ट्रात यावा, असे महाराष्ट्र भाजपाला खरेच वाटत आहे का, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मर्दानगीचा दुष्काळ, खोके सरकारमध्ये जीव नाही, शिंदे सरकारवर कुणाची आगपाखड!
Image Credit source: social media
| Updated on: Nov 25, 2022 | 9:17 AM
Share

मुंबईः महाराष्ट्राच्या (Maharashtra) अस्मितेचा घोर अपमान होत असताना खोके गटाचा एकही स्वाभिमानी आमदार उसळून उठलेला दिसत नाही. बेळगावात सुरु असलेल्या मराठी बांधवांवरील अत्याचाराविरोधात महाराष्ट्रातील एकाही भाजप पुढाऱ्याचा धिक्कार केला नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी (Karnataka CM) सांगलीतील जत, सोलापुरात (Solapur) अक्कलकोटवर दावा सांगितला आहे.

खोके सरकारात जीव नाही की मनगटात सळसळ नाही, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे. अशा मिंध्यांचे सरकार लाथ मारून घालवावेच लागेल, त्यातच सगळ्यांचे हित आहे, असा इशाराही अग्रलेखातून देण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपच्या मवाळ धोरणावर सामनातून टीका करण्यात आली आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर केलेल्या दाव्यांवर सरकार अद्याप शांत का आहे, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. बाजूचे गुजरात राज्य महाराष्ट्रातून उद्योग-व्यवसाय पळवत आहे तर कर्नाटकसारखे राज्य महाराष्ट्राचा भूभाग घशात घालण्याची भाषा करीत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्व मुद्द्यांवर गप्प आहेत. सरकार वाचवण्यासाठी ज्योतिष दरबारी बसले आहेत, असा टोमणाही लगावण्यात आलाय. एकनाथ शिंदे बुधवारी शिर्डी दौऱ्यावर असताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे एका मंदिरात त्यांनी ज्योतिष्याला हात दाखवण्याची चर्चा रंगली आहे. हाच मुद्दा पकडत सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्यात आलंय.

कर्नाटक सीमा प्रश्नावरून भाजपच्या भूमिकेवरही अग्रलेखातून शंका उपस्थित करण्यात आली आहे. बेळगाव कारवारसह संपूर्ण सीमा भाग महाराष्ट्रात यावा, असे महाराष्ट्र भाजपाला खरेच वाटत आहे का, ही शंकाच आहे. सीमाभागातील तरुणांना महाराष्ट्रातील विद्यापीठात राखीव जागा ठेवण्याचा निर्णय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता. तसा त्याग इतर कोणत्याही राजकीय पक्षाने केला नसल्याचेही सामनाच्या अग्रलेखातून दर्शवण्यात आले आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....