AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज MPSC ची केंद्रं बंद पाडणार : संभाजीराजे

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा गंभीर आरोप केला आहे (Sambhajiraje Chhatrapati allegations on Thackeray Government).

राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज MPSC ची केंद्रं बंद पाडणार : संभाजीराजे
छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Oct 07, 2020 | 5:57 PM
Share

नवी मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा गंभीर आरोप केला आहे (Sambhajiraje Chhatrapati allegations on Thackeray Government). तसेच राज्य सरकार त्यांच्या हातात असणाऱ्या गोष्टीं देखील का करत नाही, असा सवाल केला आहे. “सारथी संस्थाही सरकारने बुडीत घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं? राज्य सरकारने त्याचा खेळखंडोबा केला. मराठा समाजासोबत ते किती खेळणार? मराठा समाजातील आमदारांनी सुद्धा याची जबाबदारी घ्यायला हवी,” असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं.

संभाजीराजे यांनी राज्य सरकारवरही सडकून टीका केली. ते म्हणाले, “मराठा समाजाला सरकारनं फसवलं आहे. राज्य सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या ते का करत नाही? आरक्षण हा समतेचा लढा आहे. आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही ते मिळवणारच. सरकारने सारथी संस्थाही बुडीत घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं? राज्य सरकारने त्याचा खेळखंडोबा केला. ते मराठा समाजासोबत किती खेळणार? मराठा समाजातील आमदारांनी सुद्धा याची जबाबदारी घ्यायला हवी.”

“427 विद्यार्थी एमपीएससीमधून लागले. त्यातील 127 मराठा आहेत, त्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्याला जबाबदार कोण?”, असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला. तसेच, सरकार अनेक प्रश्न जाणून बुजून सोडवत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

“परीक्षा देणारी 2 लाख मुलं कोरोनाबाधित झाली तर त्याला जबाबदार कोण?”

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या मुद्द्यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले, “सिद्धार्थ शिंदे वाईचा मुलगा आहे. तो सध्या कोरोना बाधित आहे. तो कसा परीक्षा देणार? अशा विद्यार्थ्यांचं नुकसान का? परीक्षेला बसणारे 2 लाख मुलं कोरोनाबधित झाली तर त्याला कोण जबाबदार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला कॉल आला होता, मी केला नव्हता. एमपीएससी परीक्षा झाली, तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. या मराठा समाजाच्या भावना आहेत.”

हेही वाचा : शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिलं, आता मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार? : संभाजीराजे

“सरकार परीक्षा घेण्याची घाई का करत आहे? हे षडयंत्र आहे का कळत नाही. ज्यांची वयाची मर्यादा संपेल त्यांच्यासाठी वयाची अट शिथिल करुन वय मर्यादा वाढवा. सर्वांना घेऊन चला. माझी सरकारला विनंती वजा सूचना आहे”, असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

“राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज एमपीएससीची केंद्रं बंद करेल”

“समाजाने आपापल्या वकिलांनी काय करायला हवं हे ठरवावं, आंदोलनाची दिशा ठरवावी. मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज एमपीएससीचे केंद्र बंद करेल. अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. म्हणून महाराष्ट्र बंद करणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा”, असा इशारा संभाजीराजेंनी सरकारला दिला.

“धोका झाल्यास याला आर्थिक दुर्बल घटकात जाण्याचा आग्रह करणारे जबाबदार”

संभाजीराजे यांनी यावेळी आर्थिक दुर्बल आरक्षणाचा आग्रह करणाऱ्यांवरही हल्ला चढवला. ते म्हणाले, “समन्वयक एकमेकांशी भांडतात, काहींना समाजात दुफळी निर्माण करायची आहे. आपल्याला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आर्थिक दुर्बल घटकांमध्ये जायचं असेल तर जा. सर्वांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. धोका झाला, तर याला आज जे आर्थिक दुर्बल घटकात जाण्यासाठी आग्रही असतील तेच जबाबदार असतील”, असंही ते म्हणाले.

“संभाजीराजे आता संयमी राहणार नाही”

“संभाजीराजे आता संयमी राहणार नाही. सकल मराठा समाजाने काही निर्णय घेतले तर त्याला माझं समर्थन आहे. मी कायम तुमच्या सोबत आहे. सगळ्या आमदारांना माझी विनंती आहे की त्यांनी मंत्र्यांना निरोप द्यावेत. मंत्र्यांनी मराठा समाजाची व्यथा, दुःख यावर कॅबिनेटमध्ये चर्चा करावी. मुख्यमंत्री, मंत्री हे राज्यपालांना मराठा समाजाच्या व्यथा सांगू शकतात. राज्यपाल, राष्ट्रपती यांना सांगून विशेष अधिकार मिळू शकतो”, असंही संभाजीराजे यांनी नमूद केलं.

हेही वाचा : Exclusive : महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही; बंद पुकारून काय फायदा होईल?; संभाजीराजेंचा सवाल

संभाजीराजे म्हणाले, “आमच्या व्यथा दुःख समजून घ्या. 93 टक्के मराठा समाज गरीब आहे. ओबीसी समाजाचे अनेक नेते आले. धनगर समाजाचे मुस्लिम समाजाचे नेते आले. त्यांचं कौतुक आहे. आम्हाला ओबीसीमध्ये घुसायचं नाही. ओबीसी नेते आणि आमच्यात कुठलेही दुरावे होणार नाही. उठसूठ सुशांत प्रकरण, आमच्याकडे पण लक्ष द्यावे अशी मीडियाला विनंती आहे.”

संबंधित बातम्या :

‘मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने संविधान दुरुस्ती करुन वटहुकूम काढावा’

आरक्षणावरील स्थगिती उठवा अथवा वणवा भडकणार; मराठा आंदोलक आंदोलनावर ठाम

Live : ओबीसी नेत्यांची मराठा बैठकीला हजेरी, संभाजीराजेंच्या उपस्थितीत आरक्षणाला पाठिंबा

संबंधित व्हिडीओ :

Sambhajiraje Chhatrapati allegations on Thackeray Government

Follow Us
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल.
पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह.......
पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह........
NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव सम
NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव सम.