AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेलमध्ये टाकलं पाहिजे, ही तर फडणवीस यांचीच इच्छा, संजय राऊत यांना मोठा पलटवार!!

महाराष्ट्रातील शिवसेना विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा सत्तासंघर्षाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होत आहे. यावरून संजय राऊत म्हणाले, ' सुप्रीम कोर्ट म्हणजे ईव्हीएम मशीन नाही, दावे करायला. खरं तर आमची शिवसेना शत प्रतिशत खरी आहे.

जेलमध्ये टाकलं पाहिजे, ही तर फडणवीस यांचीच इच्छा, संजय राऊत यांना मोठा पलटवार!!
Image Credit source: social media
| Updated on: Feb 14, 2023 | 11:02 AM
Share

मुंबईः महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात मला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं जात होतं, यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मूक संमती होती, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलंय. चोराच्या मनात चांदणं, या म्हणीसारखं देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. त्यांच्या मनातच भीती होती. काहीतरी चुकीचं केलंय, असं त्यांना सारखं वाटत राहतं. पहाटेच्या शपथविधीच्या आठवणीने तर त्यांना दचकून जाग येते. एवढंच नाही तर मविआच्या काळात पोलिसांनी जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी फडणवीस यांचीच इच्छा होती, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. ही इच्छा का होती, याचं कारणही राऊत यांनी सांगितलंय.

जेलच्या आरोपांवर काय म्हणाले संजय राऊत?

मविआच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं जात होतं, असा आरोप फडणवीस यांनी केलाय. त्यावरून संजय राऊत म्हणाले, फडणवीस अनेक वर्ष राजकारणात आहेत. विरोधी पक्षनेते पदावरील व्यक्तीला राजकीय आरोपीला तुरुंगात टाकण्याची शिवसेनेची नाही. भाजपची ती असू शकते. या सूडबुद्धीच्या कारवाया ही भाजपची विकृती आहे. त्यांनी या भ्रमातून बाहेर पडलं पाहिजे. अशी भीती का वाटावी?

भाजपच्या काळात आमच्या सगळ्यांचे फोन टॅप केले जात होते. हा फार मोठा गुन्हा आहे. या केससंबंधित अधिकाऱ्यांना क्लिन चीट दिली. त्याच्याविरोधातील तपास का थांबवला… यातच ती भीती आहे. तुमचं मन खातंय. चोराच्या मनात चांदणं.. अशी म्हण आहे.मविआ सरकार बरं चालत होतं. मला तुरुंगात टाकण्यात आलं तर माझ्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण होईल, अशी त्यांची इच्छा होती, हेच कारण फडणवीस यांच्या आरोपांमागे आहे, असं स्पष्टीकऱण राऊत यांनी दिलंय.

सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजूने?

महाराष्ट्रातील शिवसेना विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा सत्तासंघर्षाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होत आहे. यावरून संजय राऊत म्हणाले, ‘ सुप्रीम कोर्ट म्हणजे ईव्हीएम मशीन नाही, दावे करायला. खरं तर आमची शिवसेना शत प्रतिशत खरी आहे. ठाकरे यांची शिवसेना खरी आहे. आमचा देशाच्या न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवता आमच्या खिशात आहे, अशा गमजा कुणी मारत असेल तर ते देशाचा अपमान करत आहेत. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाकडून न्यायाच्या अपेक्षेत आहेत.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.