AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांच्या ‘या’ चुका 80 तासात भाजपला घेऊन बुडाल्या : संजय राऊत

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे (Sanjay Raut explain mistakes of Devendra Fadnavis).

फडणवीसांच्या 'या' चुका 80 तासात भाजपला घेऊन बुडाल्या : संजय राऊत
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 01, 2019 | 8:28 PM
Share

मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे (Sanjay Raut explain mistakes of Devendra Fadnavis). राऊत यांनी फडणवीसांच्या चुकांवर बोट ठेवत या चुकांमुळेच भाजप महाराष्ट्रात बुडाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सामनातील त्यांचे सदर ‘रोखठोक’मध्ये यावर सविस्तर भाष्य केलं आहे (Sanjay Raut explain mistakes of Devendra Fadnavis).

फडणवीसांची सत्ता मिळवण्याची घाई आणि बालिश विधानं यांच्यामुळे भाजप बुडाल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, “महाराष्ट्रात विरोधी पक्ष उरणार नाही. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी हाच प्रमुख विरोधी पक्ष असेल, शरद पवार यांचे पर्व संपले, अशी बालिश विधाने करणारे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले आहेत. मी पुन्हा येईन असं ते सांगत होते. मात्र, पुन्हा येण्याची अति घाई त्यांना नडली आणि केवळ 80 तासात त्यांचे सरकार भाजपला घेऊन बुडाले. दिल्लीच्या भरवशावर आणि फाजिल आत्मविश्वासावर हे राजकारण महाराष्ट्राचा नाश करणारेच ठरले.”

महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या झुंडशाहीसमोर झुकलेला नाही. महाराष्ट्राचे पाणी वेगळेच आहे. हे मागील महिनाभरातील घडामोडींवरुन स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी दिवसाढवळ्या लाखो जनसमुदायासमोर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ही शपथ देशाचे राजकारण बदलून टाकेल, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

“मोदी शाहांचं बलाढ्य राज्य उलथवून महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री”

संजय राऊत यांनी पवारांचं कौतुक करतानाच मोदी आणि शाहांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या नाट्यमय घडामोडी कधीच घडल्या नाहीत. शरद पवार यांनी मनात आणलं तर ते कोणतीही उलथापालथ घडवू शकतात यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवावा लागला. त्याचवेळी पवारांबाबतच्या एका दंतकथेचाही शेवट झाला. शरद पवार यांचे राजकारण विश्वसनीय नाही. पवारांचे राजकारण फसवाफसवीचे आहे या दंतकथेवर आता पडदा पडला. आज महाराष्ट्रात मोदी शाह यांचे बलाढ्य राज्य उलथवून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे.”

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड