AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांच्या ‘या’ चुका 80 तासात भाजपला घेऊन बुडाल्या : संजय राऊत

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे (Sanjay Raut explain mistakes of Devendra Fadnavis).

फडणवीसांच्या 'या' चुका 80 तासात भाजपला घेऊन बुडाल्या : संजय राऊत
| Updated on: Dec 01, 2019 | 8:28 PM
Share

मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे (Sanjay Raut explain mistakes of Devendra Fadnavis). राऊत यांनी फडणवीसांच्या चुकांवर बोट ठेवत या चुकांमुळेच भाजप महाराष्ट्रात बुडाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सामनातील त्यांचे सदर ‘रोखठोक’मध्ये यावर सविस्तर भाष्य केलं आहे (Sanjay Raut explain mistakes of Devendra Fadnavis).

फडणवीसांची सत्ता मिळवण्याची घाई आणि बालिश विधानं यांच्यामुळे भाजप बुडाल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, “महाराष्ट्रात विरोधी पक्ष उरणार नाही. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी हाच प्रमुख विरोधी पक्ष असेल, शरद पवार यांचे पर्व संपले, अशी बालिश विधाने करणारे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले आहेत. मी पुन्हा येईन असं ते सांगत होते. मात्र, पुन्हा येण्याची अति घाई त्यांना नडली आणि केवळ 80 तासात त्यांचे सरकार भाजपला घेऊन बुडाले. दिल्लीच्या भरवशावर आणि फाजिल आत्मविश्वासावर हे राजकारण महाराष्ट्राचा नाश करणारेच ठरले.”

महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या झुंडशाहीसमोर झुकलेला नाही. महाराष्ट्राचे पाणी वेगळेच आहे. हे मागील महिनाभरातील घडामोडींवरुन स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी दिवसाढवळ्या लाखो जनसमुदायासमोर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ही शपथ देशाचे राजकारण बदलून टाकेल, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

“मोदी शाहांचं बलाढ्य राज्य उलथवून महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री”

संजय राऊत यांनी पवारांचं कौतुक करतानाच मोदी आणि शाहांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या नाट्यमय घडामोडी कधीच घडल्या नाहीत. शरद पवार यांनी मनात आणलं तर ते कोणतीही उलथापालथ घडवू शकतात यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवावा लागला. त्याचवेळी पवारांबाबतच्या एका दंतकथेचाही शेवट झाला. शरद पवार यांचे राजकारण विश्वसनीय नाही. पवारांचे राजकारण फसवाफसवीचे आहे या दंतकथेवर आता पडदा पडला. आज महाराष्ट्रात मोदी शाह यांचे बलाढ्य राज्य उलथवून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे.”

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.