AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांच्या ‘या’ चुका 80 तासात भाजपला घेऊन बुडाल्या : संजय राऊत

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे (Sanjay Raut explain mistakes of Devendra Fadnavis).

फडणवीसांच्या 'या' चुका 80 तासात भाजपला घेऊन बुडाल्या : संजय राऊत
| Updated on: Dec 01, 2019 | 8:28 PM
Share

मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे (Sanjay Raut explain mistakes of Devendra Fadnavis). राऊत यांनी फडणवीसांच्या चुकांवर बोट ठेवत या चुकांमुळेच भाजप महाराष्ट्रात बुडाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सामनातील त्यांचे सदर ‘रोखठोक’मध्ये यावर सविस्तर भाष्य केलं आहे (Sanjay Raut explain mistakes of Devendra Fadnavis).

फडणवीसांची सत्ता मिळवण्याची घाई आणि बालिश विधानं यांच्यामुळे भाजप बुडाल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, “महाराष्ट्रात विरोधी पक्ष उरणार नाही. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी हाच प्रमुख विरोधी पक्ष असेल, शरद पवार यांचे पर्व संपले, अशी बालिश विधाने करणारे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले आहेत. मी पुन्हा येईन असं ते सांगत होते. मात्र, पुन्हा येण्याची अति घाई त्यांना नडली आणि केवळ 80 तासात त्यांचे सरकार भाजपला घेऊन बुडाले. दिल्लीच्या भरवशावर आणि फाजिल आत्मविश्वासावर हे राजकारण महाराष्ट्राचा नाश करणारेच ठरले.”

महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या झुंडशाहीसमोर झुकलेला नाही. महाराष्ट्राचे पाणी वेगळेच आहे. हे मागील महिनाभरातील घडामोडींवरुन स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी दिवसाढवळ्या लाखो जनसमुदायासमोर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ही शपथ देशाचे राजकारण बदलून टाकेल, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

“मोदी शाहांचं बलाढ्य राज्य उलथवून महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री”

संजय राऊत यांनी पवारांचं कौतुक करतानाच मोदी आणि शाहांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या नाट्यमय घडामोडी कधीच घडल्या नाहीत. शरद पवार यांनी मनात आणलं तर ते कोणतीही उलथापालथ घडवू शकतात यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवावा लागला. त्याचवेळी पवारांबाबतच्या एका दंतकथेचाही शेवट झाला. शरद पवार यांचे राजकारण विश्वसनीय नाही. पवारांचे राजकारण फसवाफसवीचे आहे या दंतकथेवर आता पडदा पडला. आज महाराष्ट्रात मोदी शाह यांचे बलाढ्य राज्य उलथवून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे.”

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.