AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“निर्भया पथकातील गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्या”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

संजय राऊत यांचा शिंदेगटावर गंभीर आरोप...

निर्भया पथकातील गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्या, संजय राऊतांचा गंभीर आरोप
| Updated on: Dec 12, 2022 | 12:12 PM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत (Sanajy Raut) यांनी शिंदेगटावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय. ज्या आमदारांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांच्या सुरक्षेसाठी निर्भया यंत्रणा लावणं हा समस्त महिलावर्गाचा अपमान आहे. महिलांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडून ही सुरक्षा फुटीर आमदारांसाठी वापरली जातेय, मिंदेगट लोकांशी यापेक्षा अजून किती वाईट वागणार आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेगटावर (Eknath Shinde) टीका केलीय.

आम्ही गट मानत नाही जिथे ठाकरे तिथे शिवसेना! शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात वाद आहे. निर्णय घेताना दबाव असला तरी न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. महाराष्ट्र या निर्णयाची वाट पहात आहे, त्यामुळे विजय सत्याचा होणार, निकाल आमच्याच बाजूने असणार असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय.

न्यायालय आम्हाला न्याय देईल, असा आम्हाला विश्वास आहेच, शिवाय राज्यातील जनता मतांच्या माध्यमातून आम्हाला न्याय देईल, असंही राऊत म्हणालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब यांच्या नावाबाबत भावुक झाले होते. पण बॅनरवरच्या फोटोंमध्ये बाळासाहेबांना सन्मान मिळाला नाही, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब यांचा अपमान काल झाला, असं राऊत म्हणालेत.

सीमाप्रश्नी राज्य सरकारने शेपूट घातलं आहे. काल मुख्यमंत्री ओशाळून उभे होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सामोपचाराने सुटायला हवा. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी हा वाद सुरू केला. पण सीमाप्रश्न हा माणुसकीचा लढा आहे. जिंकणार तर महाराष्ट्रच!,असं राऊतांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर हल्ला करणं याच समर्थन करणार नाही,आमच्यावरही असे हल्ले झाले आहेत. त्यावेळी हे लोकं टाळ्या वाजवत होते. पण आम्ही असं करणार नाही. पण त्यांना सांगू इच्छितो की पत्रकारावर खटले दाखल करून काही होणार नाही, चिडून काही होणार नाही. संयमी भूमिका घेतली पाहिजे, असंही राऊत म्हणालेत.

Follow Us
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम.