AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राहुल गांधींनी एवढ्या व्यस्ततेतून मला फोन केला आणि म्हणाले…”, संजय राऊतांचं ट्विट

राऊतांचं ट्विट...

राहुल गांधींनी एवढ्या व्यस्ततेतून मला फोन केला आणि म्हणाले..., संजय राऊतांचं ट्विट
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 21, 2022 | 10:07 AM
Share

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस शिवसेना यांच्यातील नातं किती घट्ट आहे, हे सांगणारं ट्विट केलंय. यात त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्याला फोन करून चौकशी केल्याचं सांगितलं आहे. “भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय…”, असं ट्विट संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलंय.

राहुल गांधीनी आपल्या प्रकृतीची चौकशी केल्याचं राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. त्याचसोबत माणुसकीचा ओलावा संपत चाललेला असताना राहुल गांधींचा फोन येणं नात्यातील ओलावा दर्शवत असल्याचं राऊतांनी सांगितलं आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना अटक करण्यात आलं होतं. 110 दिवस ते तुरुंगात होते. काही दिवसांआधी त्यांना जामीन मिळाला. त्यांच्या जामीनानंतर राहुल गांधी यांचा त्यांना फोन जाणं महाविकास आघाडीतील संवादाचं द्योतक आहे.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते या यात्रेत सहभागी झाले होते. तसंच राष्ट्रवादीचे नेतेही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर राहुल गांधी यांचा राऊतांना फोन आला आहे.

Follow Us
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’