AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…तर मोदी देशाला फसवत आहेत”, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मोदी यांना सुधारण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती, पण ते अवघडच दिसत आहे", असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

...तर मोदी देशाला फसवत आहेत, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
संजय राऊत पंतप्रधान मोदी
| Updated on: Jul 05, 2024 | 10:59 AM
Share

Sanjay Raut On Narendra Modi Cheating : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात एक प्रकारे मार्शल लॉ सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मोदी यांच्या पायाखालची बहुमताची सतरंजी मतदारांनी ओढून घेतली तरी मोदी सुधारायला तयार नाहीत. मोदी यांना सुधारण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती, पण ते अवघडच दिसत आहे”, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊतांनी ‘सामना’ अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

आणीबाणीपेक्षा भयंकर स्थिती 

“मोदी हे भाषणात खोटेपणाचे पतंग उडवतात. त्यांच्या उडवाउडवीचा जनतेला वीट आला आहे. मोदी यांच्या पायाखालची बहुमताची सतरंजी मतदारांनी ओढून घेतली तरी मोदी सुधारायला तयार नाहीत. मोदी यांना पन्नास वर्षांपूर्वीच्या आणीबाणीने अकारण त्रस्त केले आहे. खरे तर मोदी यांना त्रस्त व्हायचे कारण नाही. कारण आणीबाणीपेक्षा भयंकर स्थिती त्यांच्या राज्यात सुरू आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“श्रीमती गांधी यांनी घोषित आणीबाणीच लावली. मोदी यांच्या राज्यात तर एक प्रकारे ‘मार्शल लॉ’सारखीच स्थिती निर्माण झाली आहे. मोदी यांना सुधारण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती, पण ते अवघडच दिसत आहे. नरेंद्र मोदी यांच्यात बदल होईल काय? (म्हणजे ते आता तरी सुधारतील काय?) असा प्रश्न अनेकांना अनेकदा पडत असेल. पंतप्रधानपदावर तीन वेळा बसलेल्या व्यक्तीने निदान देशाला भ्रमित करण्याची, खोटे बोलण्याची सवय तरी सोडून दिली पाहिजे, पण तिसऱ्यांदा शपथ घेऊनही मोदी बदलायला तयार नाहीत. त्यांचे फेकणे सुरूच आहे”, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

ते देशाला फसवत आहेत

“राज्यसभेतील त्यांचे बुधवारचे भाषण हा फेकाफेकीचा उत्तम नमुना आहे. मोदी यांना आता विकासावर बोलावेसे वाटले. मागच्या दहा वर्षांत विकास वगैरे काही झालेला नाही. देशातील 80 कोटी लोकांना महिन्याला माणशी पाचेक किलो धान्य फुकटात देणे याला मोदी विकास मानत असतील तर ते देशाला फसवत आहेत”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

“राज्यसभेतील एक सदस्य मनोज झा यांनी सांगितले, ‘‘ग्रामीण भागात आता मजूर मिळत नाहीत. लोकांना घरबसल्या फुकट धान्य मिळते. त्यामुळे लोक आळशी होत आहेत. मजूर मिळत नसल्याने कामे रखडली आहेत.’’ मोदी व त्यांच्या सरकारने गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली कोटय़वधी लोकांना घरबसे व आळशी केले. घरी बसा व फुकटात धान्य घ्या, त्या बदल्यात आम्हाला मते द्या, अशी मोदी यांची भूमिका दिसते. मोदी यांनी त्यांच्या भाषणात जे पतंग उडवले तेदेखील नेहमीचेच होते. तीच दारू, तीच बाटली, बाकी काय? मोदी यांनी भ्रष्टाचार निपटून काढण्याचा जुनाच नारा दिला. भ्रष्टाचाऱ्यांना, गुन्हेगारांना सोडणार नाही. ईडी, सीबीआयच्या नावाने उगाच बोंब मारू नका. या संस्था उत्तम काम करीत असल्याचे मोदी सांगतात तेव्हा आश्चर्य वाटते. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या घरगडय़ाप्रमाणे वागत आहेत”, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

मोदींच्या राज्यात ‘मार्शल लॉ’सारखीच स्थिती

“मोदी यांनी गायी कापणाऱ्या व गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून निधी स्वीकारला व लोकसभेत ते हिंदुत्वावर प्रवचने झोडतात. मोदी यांच्या हिंदुत्वाचा पराभव प्रत्यक्ष अयोध्येतच झाला. कारण सत्यवचनी रामाला भाजपचा खोटारडेपणा मान्य नव्हता. 1975 साली विरोधी नेत्यांनी सैनिकांना सरकारविरुद्ध बंड करण्याची चिथावणी दिली हे मोदींना मान्य आहे काय? मोदींना त्यांच्याविरुद्ध काढलेले व्यंगचित्र सहन होत नाही. व्यंगचित्रकारांवर ते देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतात. इथे तर देशाच्या सैन्यालाच देशविरोधी पृतीचे आवाहन केले गेले होते. पोलिसांनी सरकारी आदेश पाळू नयेत असे चरणसिंग वगैरे नेते तेव्हा सांगत होते व ते भयंकर होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी बॉम्ब बनविण्याचा कारखानाच उघडला होता व त्यांना इंदिरा गांधी यांनाच उडवायचे होते. हे सर्व घडवले जात असताना इंदिरा गांधी यांनी काय करायला हवे होते, असा मोदींचा सल्ला आहे? श्रीमती गांधी यांनी घोषित आणीबाणीच लावली. मोदी यांच्या राज्यात तर एक प्रकारे ‘मार्शल लॉ’सारखीच स्थिती निर्माण झाली आहे. मोदी यांना सुधारण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती, पण ते अवघडच दिसत आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

Follow Us
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....