AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : राजभवनाचा वापर करून शिंदे-भाजप सरकार लादलं; संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut : आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. सरकार बनवण्यासाठी राजभवनाचा वापर केला. काही लोक म्हणत आहेत, आम्हीच जिंकणार आहोत. आमच्या बाजूने निर्णय लागेल.

Sanjay Raut : राजभवनाचा वापर करून शिंदे-भाजप सरकार लादलं; संजय राऊतांचा आरोप
खासदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत नाराज, सुत्रांची माहिती, बैठकीत नेमकं काय घडलं? ज्याने राऊत नाराज झाले...Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 10:48 AM
Share

मुंबई: महाराष्ट्रात ज्या प्रकारे एक बेकायदेशीर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला ते पाहता हे सरकार लादलं आहे. त्यासाठी विधीमंडळ आणि राजभवनाचा वापर करण्यात आला. त्याविरुद्ध शिवसेना (shivsena) महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. या देशात लोकशाही आहे की नाही? या देशातील कारभार राज्यघटनेनुसार चालतो की नाही? की तिथेही दाबदबाव आहे. याचा फैसला आज होणार आहे. संपूर्ण देश सर्वोच्च न्यायालयाकडे (supreme court) एका अपेक्षने पाहतोय. यावर शेवटी जे काही निर्णय घ्यायचा तो सर्वोच्च न्यायालय घेईल. पण कोर्ट आमच्या खिशात आहे. आमच्याच बाजूने लागेल अशी व्यक्तव्य काही लोकांकडून केली जात आहेत. त्यामुळे शंका निर्माण झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय हे कुणाच्या खिशात असूच शकत नाही. या देशाची न्याय व्यवस्था कुणाची बटिक असूच शकत नाही. गुलाम असूच शकत नाही. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने आम्ही कोर्टाकडे पाहतो, असं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. सरकार बनवण्यासाठी राजभवनाचा वापर केला. काही लोक म्हणत आहेत, आम्हीच जिंकणार आहोत. आमच्या बाजूने निर्णय लागेल. काय कोर्ट यांच्या खिशात आहे का? त्यांची बटीक आहे का? नाही, असं संजय राऊत म्हणाले.

विरोधक संपवण्याचं षडयंत्र

गोव्यातही आमदार पळवले जात आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संपूर्ण देशात विरोधी पक्ष संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे. त्यामुळेच लोकशाहीला धोका आहे. राज्याबाबतचा जो निर्णय होईल, तो संसदीय लोकशाहीसाठी आशादायी असेल, असं ते म्हणाले.

पवारांची भूमिका समन्वयी

महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत बैठक होणार आहे. त्याबाबतचं सुतोवाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. त्याचं त्यांनी स्वागत केलं. पवारांनी मांडलेली भूमिका समन्वयी आहे. आम्ही सर्व बसून चर्चा करू, असं त्यांनी सांगितलं.

पवारांचा विरोध नाही

औरंगाबादच्या संभाजीनगर करण्याच्या पवारांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पवारांची एक भूमिका आहे. आमच्याशी चर्चा झाली नाही. समन्वय नव्हता एवढंच पवार म्हणाले. निर्णयाला विरोध केला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तेवढे उपकार होतील

आदित्य ठाकरे मुंबईत निष्ठा यात्रा काढत आहेत. त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ग्रासरुटची जनता फक्त शिवसेनेसोबत आहे. असली नकली आणि गटाचा प्रभाव राज्यातील लोकांवर नाही. मी काल नाशिकमध्ये होतो. लोक हजारोंच्या संख्येने मला भेटायला येत होते. बाळासाहेबांचं नावा वापरून आपल्या भाकऱ्या भाजू नये. मोठे उपकार होतील, असंही ते म्हणाले.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.