AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अधिवेशन गोंधळात वाहून जाऊ देऊ नका, गोंधळ म्हणजे रणनीती नाही; संजय राऊतांनी विरोधकांना फटकारले

राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधक गोंधळ घालण्याची चिन्हे आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारले आहे. (maharashtra assembly session)

अधिवेशन गोंधळात वाहून जाऊ देऊ नका, गोंधळ म्हणजे रणनीती नाही; संजय राऊतांनी विरोधकांना फटकारले
संजय राऊत, शिवसेना खासदार
| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 12:05 PM
Share

मुंबई: राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधक गोंधळ घालण्याची चिन्हे आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारले आहे. गोंधळ म्हणजे रणनीती नाही. त्यामुळे अधिवेशन गोंधळात वाहून जाऊ देऊ नका, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारले आहे. (Sanjay Raut slams opposition leader over maharashtra assembly session)

संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांना खडेबोल सुनावले. गोंधळ म्हणजे रणनीती नाही. अधिवेशन चालू न देणे याला रणनीती म्हणणार का? अशी रणनीती समोरून देखील होऊ शकते, पण दोन दिवसाचे अधिवेशन गोंधळात वाहू देणार का?, असा सवाल राऊत यांनी केला. राज्यापुढे अनेक प्रश्न आहे. एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यावर चर्चा होऊ शकते. कोरोनावर चर्चा होऊ शकते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊ शकते, असंही ते म्हणाले.

दोन दिवस पूर्णवेळ अधिवेशन चालू द्या

शिवसेनेचे किंवा सरकारचे अनेक मुद्दे असू शकतात. ते राज्याच्या हिताचे असू शकतात. त्याच्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. कायदे होणे गरजेचे आहेत. ठराव मंजूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी विरोधी पक्षाने विधिमंडळाचे कामकाज पूर्ण वेळ चालू देणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष स्वतःला महाराष्ट्राचे समजत असतील, त्यांना महाराष्ट्राचे हित व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी दोन दिवस पूर्ण वेळ अधिवेशन चालू द्यावे, असं आवाहनही त्यांनी केलं.

गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी

कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यासंदर्भात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. या क्षेत्रात मी काम करतोय. त्यामुळे मला माहीत आहे तिथे काय चालतं, असं त्यांनी सांगितलं.

तीन पक्षांचे एकमत

महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तीन पक्षांनी कृषी कायद्याबाबतचा ठराव केला आहे. म्हणजे तीन पक्षांचे एकमत आहे, असं त्यांनी सांगितलं. (Sanjay Raut slams opposition leader over maharashtra assembly session)

संबंधित बातम्या:

हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, संजय राऊतांचं सूचक ट्विट

कुणालाही भेटलो नाही, अफवांनी राजकारण हलत नाही, अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील: राऊत

एनडीए असो की यूपीए ओबीसींना न्याय हक्क मिळाला नाही; महादेव जानकरांचा भाजपला घरचा आहेर

(Sanjay Raut slams opposition leader over maharashtra assembly session)

Follow Us
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.