AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Shirsat : ‘शिवसेनेचा उमेदवार हरल्यावर बाळासाहेब फक्त एक ग्लास…’ संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य

मतदारांनी आपल्याला खऱ्या अर्थांने प्रेम दिले. त्यांच्या जीवावर आम्ही निवडून आलो आहोत. मतदारांनी शिवसेना मोठी केली आहे. काही लोक रोज टिव्हीवर बोलतात त्यांना काय बोलाव हेच कळत नाही अशी टीका शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

Sanjay Shirsat : 'शिवसेनेचा उमेदवार हरल्यावर बाळासाहेब फक्त एक ग्लास...' संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य
Sanjay Shirsat : 'शिवसेनेचा उमेदवार हरल्यावर बाळासाहेब फक्त एक ग्लास...' संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्यImage Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Jul 15, 2022 | 7:52 AM
Share

मुंबई – शिवसेनेत (Shivsena) आमदारांनी बंड केल्यापासून एकमेकांवरती आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. बंड केल्यापासून शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा अस्थिर आहेत. शिंदे गटात अधिक आमदार असल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्ते सुद्धा आता शिंदे गटाकडे वळायला सुरुवात केली आहे. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मीरा भाईंदरमधील काल 18 नगरसेवक शिंदे गटात सामील केले. पालिकेच्या निवडणुकीच्या आगोदर अधिक नगरसेवक शिंदे गटात सामील होतील असा अंदाज आहे. 38 वर्षांपासून शिवसेनेत आहे, बाळासाहेब होते त्यावेळी शिवसेनेचा उमेदवार हरला तर ते फक्त एक ग्लास दूध प्यायचे. पण आज काही लोक रोज सकाळी उठून शरद पवारांकडे जातात अशी टीका संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी राऊतांवरती केली आहे.

रात्री सभा घेण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे

रात्री सभा घेण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.यामिनी जाधव यांना कॅन्सर आहे. मी रिक्षाचालक आमचे मुख्यमंत्रीही रिक्षाचालक, तुमच्याकडे इनकमिंग आहे. ही माणसे आउट-गोइंग आहेत. देणारे लोक आहेत. हेच आजच्या मोलाचे कारण आहे, शिंदे साहब तुम आगे बढ़ी हम तुम्हारे साथ है असं देखील बोलत असताना संजय शिरसाठ म्हणाले.

मतदारांनी शिवसेना उभी केली

मतदारांनी आपल्याला खऱ्या अर्थांने प्रेम दिले. त्यांच्या जीवावर आम्ही निवडून आलो आहोत. मतदारांनी शिवसेना मोठी केली आहे. काही लोक रोज टिव्हीवर बोलतात त्यांना काय बोलाव हेच कळत नाही अशी टीका शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर केली. ज्यांची बायको ऐकत नाही ते म्हणतात निवडणून येणार नाही. आंबादास दानवे यांचा आपल्याला बदला घ्यायचे आहे असं त्यांनी दानवे यांच्यावरी टीका केली. त्याबरोबर त्यांच्या किती बायका असा टोला देखील त्यांनी लगावला. त्यांना जय महाराष्ट्र केल्यानंतर ते बघत देखील नव्हते. एखादेवेळेस निधी मागायला गेल्यानंतर दहा टक्के निधी मागत होते अशी टीका सुभाष देसाई यांच्यावर केली. एक जन रोज शरद पवार यांचे गुण गाण गात सुटले आहेत.पण रात्रीची सभा घेण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. यामिनी जाधव आजारी आहेत म्हणून त्यांनी कोणी विचारत नव्हते अशी टीका देखील त्यांनी नाव न घेता काही नेत्यांवरती केली.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.