AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खैरेंना ज्यानं पाडलं, तो मुंडक्यावर पाय देऊन पुढे गेला, शिरसाटांची विखारी टीका, रोख कुठे?

खैरेंच्या लोकसभेतील पराभवासाठी त्यांच्याच गटातील नेते (अंबादास दानवे) जबाबदार असल्याचा आरोप शिरसाट यांनी केलाय.

खैरेंना ज्यानं पाडलं, तो मुंडक्यावर पाय देऊन पुढे गेला, शिरसाटांची विखारी टीका, रोख कुठे?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 30, 2022 | 3:43 PM
Share

दत्ता कनवटे, औरंगाबादः दसरा मेळाव्याच्या (Dussehra Melava) पार्श्वभूमीवर आज औरंगाबादेत शिंदे गटातील नेत्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात संजय शिरसाट यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर जहरी टीका केली. चंद्रकांत खैरे यांना ज्यानं पाडलं, तो त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन पुढे कसा निघून गेला, असा सवाल शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला. चंद्रकांत खैरे यांना शप्पथ आहे, त्यांनी या प्रश्नाचं खरं उत्तर द्यावं, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं. शिरसाट यांचा इशारा अंबादास दानवेंकडे होता. त्यामुळे या वक्तव्यामुळे जुन्या घटना पुन्हा उफाळून येणार अशी चिन्ह आहेत.

अनेक वर्षे लोकसभेत खासदारकी भूषवल्यानंतर 2019 मध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. एमआयएम नेते इम्तियाज जलील यांचा विजय झाला. तेव्हापासून चंद्रकांत खैरे यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्याचं म्हटलं जातंय.

मात्र खैरेंच्या या पराभवासाठी त्यांच्याच गटातील नेते (अंबादास दानवे) जबाबदार असल्याचा आरोप शिरसाट यांनी केलाय. सध्या शिवसेनेत मोठी फूट पडल्याने अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचं संघटन मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. मात्र शिरसाटांच्या वक्तव्यामुळे जुन्या वादाला तोंड फुटतं की काय, अशी स्थिती आहे.

काँग्रेसवर टीका करताना शिरसाट म्हणाले, काँग्रेस हे सुस्त अजगर आहे. एकदा खाल्लं पडलं की पुन्हा उठतच नाही.

याच मेळाव्यात अब्दुल सत्तारांनीही जोरदार भाषणबाजी केली. आधीचे मुख्यमंत्री मी आणि माझं कुटुंब असे होते. आताचे मुख्यमंत्री लोकनाथ आहेत.. असं ते म्हणाले…

सत्तार म्हणाले मला कुत्रं निशाणी दिली तरी….

आपण निवडून यायचो आणि चिन्हांच्या नावावर फायदा ते घ्यायचे, अशा लोकांना आता भिंगातून शोधावं लागणार, अशी टीका अब्दुल सत्तारांनी शिवसेनेवर केली.

Follow Us
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा