AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साताऱ्याच्या गादीचा आदर ठेवला नाही, जनतेने कौल दिला : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येताच पत्रकार परिषद घेत जनतेने दिलेल्या जनमताबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

साताऱ्याच्या गादीचा आदर ठेवला नाही, जनतेने कौल दिला : शरद पवार
| Updated on: Oct 24, 2019 | 3:26 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येताच पत्रकार परिषद घेत जनतेने दिलेल्या जनमताबद्दल आभार व्यक्त केले आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह आघाडीतील सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्याचं सांगत त्या सर्वांचे देखील आभार मानले. यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar on Satara Loksabha ByPoll) सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांना (Sharad Pawar on Udayanraje Bhosale) देखील टोला लगावला. उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या गादीचा आदर ठेवला नाही. सातारकरांनी कौल देत यावर शिक्कामोर्तब केला आहे.

शरद पवार म्हणाले, “विधानसभा निवडणुकीसोबत एकच लोकसभेची जागा होती. त्याकडे सर्वांचेच लक्ष होते. साताऱ्यात लोकांवर कारण नसताना लोकसभा निवडणूक लादली गेली. त्यामुळे साताऱ्याच्या जनतेने त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात साताऱ्याच्या गादीबद्दल आदर आहे. आम्हाला देखील साताऱ्याच्या गादीबद्दल आदर आहे. मात्र, गादीवरील लोकांनी हा आदर कायम  ठेवला नाही. त्यामुळे जनतेने हा कौल दिला आहे. साताराच्या जनतेने श्रीनिवास पाटील यांच्यासारख्या अनुभवी राजकारण्याला विजयी केले. त्याबद्दल मी साताऱ्याच्या जनतेचे आभार मानतो. साताऱ्यात जाऊन मी सातारकरांचे आभार मानणार आहे.”

विधानसभा निवडणुकीतील निकालातून जनतेला सत्तेचा उन्माद आवडला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सत्ता दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी जमिनीवर राहून काम करायचं सोडून सत्तेचा उन्माद केला. याला लोकांना अमान्य केलं आहे. तसेच पक्षांतराला देखील लोकांनी पसंती दिली नाही. अपवाद वगळता प्राथमिक स्तरावर पक्षांतर केलेल्या नेत्यांना जनतेने नाकारले आहे, असंह शरद पवार यांनी नमूद केलं.

‘भविष्यात नव्या पिढीला सोबत घेऊन नवं नेतृत्व तयार करणार’

शरद पवार म्हणाले, “या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आणि पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांची एक बैठक घेऊन कामाचा आढावा घेणार आहे. आता दिवाळी आहे. त्यामुळे ही बैठक दिवाळीनंतर घेतली जाईल आणि त्यात पुढील कृतीकार्यक्रम ठरवला जाईल. भविष्यात नव्या पिढीला सोबत घेऊन नवं नेतृत्व तयार करण्यासाठी काम करण्याचा विचार आहे. त्याची सुरुवात माझ्यापासूनच करणार आहे.”

या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून 220 पेक्षा अधिक जागा येईल, असं वातावरण तयार करण्यात आलं होतं. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाआघाडीच्या इतर मित्रपक्षांनी जी मेहनत घेतली त्याला यश आलं आहे. आमचा प्रयत्न यापेक्षाही पुढे जाण्याचा होता. मी या यशाबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आभार मानतो, असंही शरद पवार म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.