AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणराव, सगळ्यांना एकत्र घेऊ म्हटलंय हं, शरद पवारांच्या वक्तव्याने हशा

शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करु, असं कल्याणराव काळे आधी म्हणाले होते.

कल्याणराव, सगळ्यांना एकत्र घेऊ म्हटलंय हं, शरद पवारांच्या वक्तव्याने हशा
| Updated on: Dec 18, 2020 | 3:45 PM
Share

पंढरपूर : भाजप नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांनी राष्ट्रवादीच्या वाटेवर जाण्याचे संकेत दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. पंढरपूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कल्याणराव, सगळ्यांना एकत्र करुन निर्णय घेऊ, असं म्हणत शरद पवारांनीही कल्याणरावांच्या पक्षप्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले. सरकोली येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे हे शरद पवारांसोबत एकाच मंचावर उपस्थित होते. (Sharad Pawar on Kalyanrao Kale in Pandharpur)

वयाच्या ऐशीव्या वर्षातही तरुणांना लाजवेल असा उत्साह शरद पवारांमध्ये पाहायला मिळत आहे. नुकतंच राजीव आवळे यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या उत्साही व्यक्तिमत्ताचा दाखला दिला होता. तुम्ही आता मला वडिलधारे म्हणू शकता, असं पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

“कल्याणराव, सगळ्यांना एकत्र घेऊ म्हटलंय हं”

“सगळ्यांनी एकत्र निर्णय घेऊन निर्णय घेऊ. कल्याणराव, सगळ्यांना म्हटलंय हं.. सगळ्यांना बरोबरीत घेऊन निर्णय घेऊ. सगळे येतात, एकत्र चर्चा करतात, त्याचं काय वेगळं होणार आहे का?” असं पवार मिश्किलपणे म्हणाले.

कल्याणराव काळे काय म्हणाले?

कल्याणराव काळे यांनी या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याचीही चांगलीच चर्चा आहे. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करु, असं काळे म्हणाले. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुरांडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल, चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण  यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार आज सकाळी सरकोली येथे आले होते. या सर्व कार्यक्रमात कल्याणराव यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली.

कल्याणराव काळे यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून 65 हजार मते मिळवली होती. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणराव काळेंनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते.

कोण आहेत कल्याण काळे?

कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठं नाव आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले

भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष (Sharad Pawar on Kalyanrao Kale in Pandharpur)

सिताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक

श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष

सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष

सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष

राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष

माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार

राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीचा भाजपला पहिला झटका, नेते कल्याण काळे घड्याळ बांधणार?

(Sharad Pawar on Kalyanrao Kale in Pandharpur)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.