AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : शिवबंधन नंतर आता प्रतिज्ञापत्र, गळती रोखण्यासाठी शिवसेनेचा काय आहे फंडा?

एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांनी केलेल्या बंडामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. बंड तर झालेच पण आता शिंदे गटाकडून थेट पक्षावरही आपलाच हक्क सांगितला जात आहे. यामुळे भविष्यात अशा संकटाला सामोरे जाण्याची नामुष्की ओढावू नये म्हणून हा काळजी घेतली जात आहे.

Shivsena : शिवबंधन नंतर आता प्रतिज्ञापत्र, गळती रोखण्यासाठी शिवसेनेचा काय आहे फंडा?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
| Updated on: Jul 02, 2022 | 10:41 AM
Share

मुंबई : शिवसैनिक हे (Shivsena) शिवसेनेशी किती एकनिष्ठ आहेत हे सांगण्याचा प्रयत्न सातत्याने होत असला तरी गेल्या काही दिवसांपासून सुरु झालेली गळती खुद्द पक्ष प्रमुख यांना देखील रोखता आलेली नाही. (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्या बरोबर एक नाही दोन नाही तर 39 आमदारांनी बंड केले आहे. एवढेच नाहीतर आता खासदारही शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता पक्षाकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. आतापर्यंत शिवबंधन बांधले जात होते पण यानंतर शिवसैनिकांना एकनिष्ठतेचे (Declaration) प्रतिज्ञापत्रच द्यावे लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास असल्याचे ते प्रतिज्ञापत्र असणार आहे. बंडखोरांच्या भूमिकेवरुन आता असे बदल पक्षामध्ये केले जात आहेत. शिवबंधन नंतर आता चर्चा आहे ती प्रतिज्ञापत्राची

काय असणार आहे प्रतिज्ञा पत्रामध्ये?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. असा मजकूर या पत्रावर असणार आहे. त्यामुळे कोणी पक्ष सोडला तरी त्यापेक्षा वेगळा काही रोल घेऊ नये म्हणून ही काळजी पक्षाकडून घेतली जात आहे. आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखाप्रमुखांना अशाप्रकारचे पत्र द्यावे लागणार आहे. भविष्यात कोणी पक्षाबाबत वेगळा असा दावा करु नये शिवाय शिवसैनिकांची वज्रमूठ कायम आहे हे दाखवून देण्यासाठी हा फंडा राबवला जात आहे.

शिवसेनेकडून सावध पवित्रा

एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांनी केलेल्या बंडामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. बंड तर झालेच पण आता शिंदे गटाकडून थेट पक्षावरही आपलाच हक्क सांगितला जात आहे. यामुळे भविष्यात अशा संकटाला सामोरे जाण्याची नामुष्की ओढावू नये म्हणून हा काळजी घेतली जात आहे. यापूर्वी शिवबंधनाचे बंधन होते. असे असतानाही अनेकांनी पक्ष सोडला पण आता प्रतिज्ञापत्रामुळे विचार करुन बाहेर पडावे लागेल यामुळेच ही नियमावली जारी करण्यात आली आहे.

पक्षाकडून प्रतिज्ञापत्राची मागणी

आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत शिवाय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे हे प्रतिज्ञापत्र असणार आहे. हा केवळ घोषणाच नाहीतर प्रतिज्ञापत्र घेण्यासही सुरवातही करण्यात आली आहे. यामध्ये पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख यांना हे द्यावे लागणार आहे. पक्षाला एका नियमावलीत आणण्यासाठी आता प्रयत्न केले जाणार आहेत.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.