AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahendra Dalvi : शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांना दोन वर्षाची शिक्षा, काय आहे जुनं प्रकरण?

अलिबागमधील एका जुन्या प्रकरणाने आज राज्याच्या राजकारणत खळबळ माजवली आहे. कारण यात तीन आरोपींना दोन वर्षांती शिक्षात झालीय. त्यात अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचाही सामावेश आहे. अलिबाग कोर्टाने आज या प्रकरणावर महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

Mahendra Dalvi : शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांना दोन वर्षाची शिक्षा, काय आहे जुनं प्रकरण?
शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांना दोन वर्षाची शिक्षाImage Credit source: tv9
| Updated on: May 13, 2022 | 9:33 PM
Share

रायगड : शिवसेना (Shivsena) आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi) यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. महेंद्र दळवी हे शिवसेनेचे अलिबागचे आमदार आहेत. अलिबाग सत्र न्यायालयाने (Alibag Session Court) हा निर्णय दिला आहे. तीन वर्षांपूर्वी मारहाण प्रकरणात ही शिक्षा झाल्याची माहिती समोर आली आहे. रायगडच्या राजकारणात नेहमीच काही ना काही मोठ्या राजकीय घडामोडी घडत असतात. त्यातच आता या प्रकरणात असा निकाल आल्याने पुन्हा रायगडचं राजकारण ढवळून निघतंय. एका लोकप्रतिनिधीला अशा प्रकारची शिक्षा होणे ही पहिलीच वेळ नसली तरी मारहाणी सारख्या प्रकरणात ही शिक्षा झाल्याने सध्या राजकारणात याची जोरदार चर्चा आहे. या शिक्षेचा आगामी निवडणुकीवर काही परिणाम होतो का? हे आता येणाऱ्या निवडणुकानंतरच कळेल. मात्र सध्या तरी हे प्रकरण रायगडमध्ये गाजतंय.

काय होतं हे प्रकरण?

आमदार महेंद्र दळवी यांच्यासह अन्य तिघांना दोन वर्षाचा कारावास असा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल आज आला आहे. निवडणुकीवरून दोन गटात तीन वर्षा पूर्वी हाणामारी झाली होती. यात एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यात आमदार महेंद्र दळवी, अंकुश पाटील,अनिल पाटील, अविनाश म्हात्रे यांना दोन वर्ष कारावास आणि रुपये पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सत्र न्यायलयाने सुनावली आहे, जातीवाचक शिवी गाळ,  गैर कायद्याची मंडळी जमवून मारहाण केली, असा आरोप यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राजकारणात दोन गटात संघर्ष हा नेहमी ठरलेला असतो, स्थानिक लेव्हला या संघर्षाची तीव्रता अधिक असते. त्यातूनच हे प्रकरण घडलं आहे. त्यामुळे दळवी यांच्याकडून आता पुढील पर्यायांची चाचणी सुरू झाली आहे.

काही महिन्यांपूर्वीही दळवी चर्चेत

गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत अलिबागमध्ये दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर अनेक बंगले आहेत, असा आरोप सोमय्यांनी केला होता. तसेच हे बंगले पहायला सोमय्या गेले होते. तेव्हा त्यांना याच दळवी यांनी इशारा देत विरोध केला होता. तेव्हाही दळवी बरेच चर्चेत आले होते. कोकणता शिवसेना नेत्यांची मोठी ताकद आहे. त्यातून राणे, भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष नेहीमी सुरूच असतो. त्या संघर्षाला अलिकडील काळात आता आणखी धार आली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.