“उन्हे सफलतासे मारो और मुस्कुराहट से दफना दो!”, औरंगाबादच्या विराट सभेनंतर संजय राऊतांचे विरोधकांवर बाण

औरंगाबादेतल्या विराट सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत अन् शिवसेनेच्या इतर नेत्यांनी विरोधकाचे वाभाडे काढले. त्यानंतर आज संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करत विरोधकांना गाडण्याची भाषा केली आहे.

उन्हे सफलतासे मारो और मुस्कुराहट से दफना दो!, औरंगाबादच्या विराट सभेनंतर संजय राऊतांचे विरोधकांवर बाण
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 11:56 AM

मुंबई : औरंगाबादेतल्या विराट सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , संजय राऊत (Sanjay Raut) अन् शिवसेनेच्या इतर नेत्यांनी विरोधकाचे वाभाडे काढले. त्यानंतर आज संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करत विरोधकांना गाडण्याची भाषा केली आहे.संजय राऊत ज्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात त्याच पद्धतीने त्यांनी विरोधकांना सूचना वजा इशारा देणारं ट्विट केलं आहे.”उन्हे सफलतासे मारो और मुस्कुराहट से दफना दो!”, असं म्हणत त्यांनी विरोधकांना गर्भित इशारा दिला आहे.

संजय राऊतांचं ट्विट

राऊतांनी ट्विटच्या माध्यमातून विरोधकांवर बाण सोडलाय. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो समोरचा त्यांचा फोटो शेअर केला आहे. आपल्या यशाने, कीर्तीने विरोधकांना मारा आणि आपल्या हास्याने त्यांना गाडा, असं कॅप्शन त्यांनी दिलंय. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांचं हे ट्विट सूचक आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या राज्यसभा आणि विधानपरिषदेची निवडणूक होतेय. सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. अश्यात सहावी जागा आमचीच असा दावा भाजप आणि महाविकास आघाडी दोघांकडून करण्यात येतोय. यात मतदानाच्या एक दिवस आधी संजय राऊतांचं हे असं ट्विट विजय महाविकास आघाडीचाच होणार असा विश्वास दाखवणारं आहे.

“देशाचं नेतृत्व ठाकरेच करू शकतात”

आजच्या घडीला देशाचं नेतृत्व फक्त महाराष्ट्र करू शकतो.ती ताकद फक्त उद्धव ठाकरेंमध्येच आहे, असा दावा संजय राऊत यांनी औरंगाबादच्या विराट सभेत केला. काश्मीरमध्ये होत असलेल्या हिंदुंच्या हत्यांवरून राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला. काश्मीरी पंडितांना आता फक्त हिंदुहृदय सम्राट उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहेत, असंही राऊत म्हणाले. औरंगाबादमधील शिवसेनेच्या शाखेच्या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे यांची जाहीर विराट सभा आयोजित करण्यात आली होती. तिथे ते बोलत होते.

आमदारांची हॉटेल वारी

राज्यसभा निवडणुकीमध्ये एकही मत फुटू नये यासाठी सर्वच पक्ष अतोनात प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं गेलंय. आमदार फुटू नयेत यासाठी दोन्ही बाजूने काळजी घेतली जात आहे. मतदान कसं करावं या संदर्भात आमदारांची कार्यशाळाही झाली. त्याबरोबर आपल्या पारड्यात छोट्या पक्षांच्या आमदाराचं आणि अपक्ष आमदारांचं मत कसं पडेल यासाठी चुरस सुरू आहे.

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.