AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…त्या दिवशी महाराष्ट्रात तुमची किंमत कचऱ्याचीही राहणार नाही”, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा

कटोरे घेऊन दिल्लीच्या दरबारात आणि गुजराती व्यापारी मंडळाच्या दरबारात गेल्या अडीच वर्षांपासून कोण आहे?" असा सवाल संजय राऊत यांनी केला.

...त्या दिवशी महाराष्ट्रात तुमची किंमत कचऱ्याचीही राहणार नाही, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा
संजय राऊत, एकनाथ शिंदे
| Updated on: Sep 30, 2024 | 12:02 PM
Share

MP Sanjay Raut Target CM Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. त्यातच आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी रंगताना दिसत आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. ठाकरे घराण्यामुळेच तुम्ही या पदावर पोहोचला आहात. ज्या दिवशी मोदी शाहांचा तुमच्या डोक्यावरील हात जाईल, त्या दिवशी महाराष्ट्रात तुमची किंमत कचऱ्याचीही राहणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एकनाथ शिंदेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंवर टीका केली.

“कटोरे घेऊन दिल्लीच्या दरबारात कोण?”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वत:ला ट्वीट करता येतं का? आम्ही त्यांना ओळखतो. ट्वीट करण्यांना आधी ट्रेनिंग द्या. कटोरे घेऊन दिल्लीच्या दरबारात आणि गुजराती व्यापारी मंडळाच्या दरबारात गेल्या अडीच वर्षांपासून कोण आहे?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.

“गुजरातच्या दरबारात अडीच वर्षांपूर्वी सूरतला मोदी शाहांची भांडी घासायला कोण गेलं होतं? मुख्यमंत्रिपदासाठी मोदी शाहांची धुणी भांडी करायला तुम्हीच गेला होतात. आताही दिल्लीत मोदी शाहांच्या उंबरठ्यावरील तुम्ही पायपुसणे आहात. ज्या दिवशी मोदी शाहांचा तुमच्या डोक्यावरील हात जाईल, त्या दिवशी महाराष्ट्रात तुमची किंमत कचऱ्याचीही राहणार नाही”, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.

“तुम्ही गुजरातच्या व्यापारी मंडळाचे गुलाम”

“हे ठाकरे घराणं आहे. या ठाकरे घराण्यामुळेच तुम्ही या पदावर पोहोचला आहेत. ठाकरेंबद्दल बोलताना तुमचं पूर्वीचं आयुष्य काय होतं हे लक्षात ठेवा. तुम्ही गुजरातच्या व्यापारी मंडळाचे गुलाम आहात”, असेही संजय राऊत म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.