AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : … म्हणून निवडणूका लांबणीवर, जयंत पाटलांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट..!

जनता आता जागृत झाली आहे. राजकीय घडामोडी ह्या राज्याच्या राजधानीत होत असल्या तरी गल्लीतील ग्रामस्थही आता अपडेट आहे. त्यामुळे काही लपून हे राहतच नाही. महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केली ती रीतसर मार्गानेच. त्यामुळे अडीच वर्ष सरकार यशस्वीरित्या काम करु शकले. पण शिंदे सरकार हे अवैध मार्गाने सत्तेत आले आहे. आता अडीच महिने होऊनही त्यांच्या मनात कायम भीती आहे.

Nashik : ... म्हणून निवडणूका लांबणीवर, जयंत पाटलांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट..!
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसImage Credit source: Google
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 04, 2022 | 9:01 PM
Share

नाशिक : गेल्या अडीच महिन्यात घडलेल्या राजकीय घटनांचे साक्षीदार राज्यातील 11 कोटी जनता आहे. सर्वकाही जनतेसमोर झाले असून या सर्व प्रकारावर चिंतन केले जात आहे. ज्या पद्धतीने (Transfer of power) सत्तांतर झाले त्याबद्दल जनतेच्या मनात रोष असून हे न विसरता येण्यासारखे आहे. कदाचित मतदानातून जनता आपला रोष व्यक्त करेल हीच भीती सरकारला असावी म्हणूनच (Municipal Election) महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका ह्या लांबणीवर टाकल्या जात आहेत. जे झाले ते रीतसर नाही याची कल्पना खुद्द सरकारलाही असल्याने त्याचा फटका आगामी काळात बसू नये म्हणूनच निवडणूकीचे धोरणे ठरवली जात असावीत असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (Jayant Patil) जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे. शिवाय महाविकास आघाडी कोणतीही बाब रीतसर मार्गानेच करते, तर राज्य सरकार सर्वकाही अवैध मार्गाने हाच दोन्ही मधला फरक असल्याचे म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे.

निवडणूका लागल्या तर चित्र वेगळे

सध्या राज्यातील महापालिकांवर प्रशासक नेमलेले आहे. शिवाय अद्यापही निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. विकास कामे आणि कमी कालावधीत असे दावे शिंदे सरकारकडून केले जात असतील तर निवडणूकांपासून हे सरकार दूर का पळतंय असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. जनतेने आम्हाला मान्य केले हे ठणकावून सांगितले जात असले तरी जनतेच्या मनात काही वेगळेच आहे. त्याचाच फटका बसू नये म्हणून आजची निवडणूक उद्यावर ढकलली जात असल्याचा आरोपही पाटलांनी केला आहे.

पाटलांनी सांगितला दोन्ही सरकारमधला फरक

जनता आता जागृत झाली आहे. राजकीय घडामोडी ह्या राज्याच्या राजधानीत होत असल्या तरी गल्लीतील ग्रामस्थही आता अपडेट आहे. त्यामुळे काही लपून हे राहतच नाही. महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केली ती रीतसर मार्गानेच. त्यामुळे अडीच वर्ष सरकार यशस्वीरित्या काम करु शकले. पण शिंदे सरकार हे अवैध मार्गाने सत्तेत आले आहे. आता अडीच महिने होऊनही त्यांच्या मनात कायम भीती आहे. हाच दोन्ही सरकारमधला फरक असल्याचे पाटील म्हणाले आहेत.

सत्तांतराचे वर्तुळ हे पूर्ण होणारच

राजकारणात दिवस हे सारखे राहत नाहीत. अलिकडच्या काळात तर अधिक झपाट्याने बदल होत आहे. बदलावर विश्वास ठेऊन कार्यकर्त्याने आपले काम कऱणे महत्वाचे आहे. शिवाय सरकार तर गैरमार्गाने सत्तेत आले आहे. त्यामुळे किती काळ टिकेल हे सांगता येणार नाही. राजकारणात असे प्रसंग येतात पण विचलित न होता काम करणे महत्वाचे असल्याचेही जयंत पाटील म्हणाले आहेत.

सरकारच्या मनात भीती कायम

शिंदे सरकारकडून जो अविर्भाव आणला जात आहे तो दिखावून आहे, पण जनतेसमोर गेल्यावर काय होईल याची धास्तीही त्यांच्या मनात आहे. त्यामुळेच होऊ घातलेल्या निवडणूका दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक लवकर लागली तर पंचाईत होईल असेही काही लोकांना वाटत असल्याचे म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या