AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगरचं नाव बदललं, त्याच स्वागत, पण…; नामांतरावरून जयंत पाटलांची सरकारला टोला

अहमदनगरचं नामांतर, सरकारची भूमिका अन् पुतळे हटवण्याचा मुद्दा; नामांतराच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांची सरकारवर घणघात

अहमदनगरचं नाव बदललं, त्याच स्वागत, पण...; नामांतरावरून जयंत पाटलांची सरकारला टोला
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 01, 2023 | 1:02 PM
Share

सोलापूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहमदनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. महाराष्ट्र सदनात सावरकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रमध्ये तीव्र नाराजी आहे. अहमदनगरचं अहिल्यादेवीनगर नामांतर या निर्णयाचा आम्ही स्वागतच करतो. पण जो बुंद से जाती है हौद से नही आता है, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मनात अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई यांच्याबद्दल काय भावना आहेत या दिल्लीतील कार्यक्रमाने दाखवून दिलं आहे. त्यामुळे नामांतराचा मुद्दा जरी पुढे केला असला तरी लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे, असंही ते यावेळी म्हणालेत.

भाजपचा अलीकडे प्रॉब्लेम झालं की अनेक लोक राष्ट्रवादीतून तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे निष्ठावंत कुठे बसवायचं आणि नव्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून तिथं गेलेल्या लोकांना कुठं बसवायचं हा त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. तो त्यांता अंतर्गत प्रश्न जरी असला तरी काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपतं जी लोकं गेलीत. या सगळ्यांच्या ओझ्याखाली निष्ठावंत मागे ढकलले गेले आहेत, ती अस्वस्थता भाजपमध्ये नक्की आहे, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

जगात ज्या महिलांनी नाव कमावलं. पदक मिळवलं त्यांना खाली रस्त्यावर पाडणं पोलिसांनी तोंडावर पाय ठेवणं, याचा देशातील खेळाडू आणि खेळावर प्रेम करणारी जनता निषेध करते. एका बाजूला संसदेचं उदघाटन करता आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन चिरडता… संसद उदघाटन सुरु असताना आंदोलन चिरडलं तरी मीडिया दाखवणार नाही यासाठी हे खटाटोप केले गेले. पण जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिलीय भाजपने स्वतःहून कार्यक्रमला गालबोट लावून घेतलं, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

बृजभूषण सिंहवर कारवाई झाली पाहिजे. एवढा पोटतिडकीने मुलींच्या तक्रारी आहेत. त्या तक्रारी गांभीर्यानं घेतल्या पाहिजेत. पण सरकार त्याकडे पाहत नाही. कुणीही आंदोलन केलं तो सरकार त्या विरोधात मनात राग धरणारे, लोकशाही न मानणारे आहेत, असा समज पसरलला जातो, असं म्हणत जयंत पाटलांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ