अहमदनगरचं नाव बदललं, त्याच स्वागत, पण…; नामांतरावरून जयंत पाटलांची सरकारला टोला

अहमदनगरचं नामांतर, सरकारची भूमिका अन् पुतळे हटवण्याचा मुद्दा; नामांतराच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांची सरकारवर घणघात

अहमदनगरचं नाव बदललं, त्याच स्वागत, पण...; नामांतरावरून जयंत पाटलांची सरकारला टोला
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 1:02 PM

सोलापूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहमदनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. महाराष्ट्र सदनात सावरकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रमध्ये तीव्र नाराजी आहे. अहमदनगरचं अहिल्यादेवीनगर नामांतर या निर्णयाचा आम्ही स्वागतच करतो. पण जो बुंद से जाती है हौद से नही आता है, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मनात अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई यांच्याबद्दल काय भावना आहेत या दिल्लीतील कार्यक्रमाने दाखवून दिलं आहे. त्यामुळे नामांतराचा मुद्दा जरी पुढे केला असला तरी लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे, असंही ते यावेळी म्हणालेत.

भाजपचा अलीकडे प्रॉब्लेम झालं की अनेक लोक राष्ट्रवादीतून तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे निष्ठावंत कुठे बसवायचं आणि नव्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून तिथं गेलेल्या लोकांना कुठं बसवायचं हा त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. तो त्यांता अंतर्गत प्रश्न जरी असला तरी काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपतं जी लोकं गेलीत. या सगळ्यांच्या ओझ्याखाली निष्ठावंत मागे ढकलले गेले आहेत, ती अस्वस्थता भाजपमध्ये नक्की आहे, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

जगात ज्या महिलांनी नाव कमावलं. पदक मिळवलं त्यांना खाली रस्त्यावर पाडणं पोलिसांनी तोंडावर पाय ठेवणं, याचा देशातील खेळाडू आणि खेळावर प्रेम करणारी जनता निषेध करते. एका बाजूला संसदेचं उदघाटन करता आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन चिरडता… संसद उदघाटन सुरु असताना आंदोलन चिरडलं तरी मीडिया दाखवणार नाही यासाठी हे खटाटोप केले गेले. पण जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिलीय भाजपने स्वतःहून कार्यक्रमला गालबोट लावून घेतलं, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

बृजभूषण सिंहवर कारवाई झाली पाहिजे. एवढा पोटतिडकीने मुलींच्या तक्रारी आहेत. त्या तक्रारी गांभीर्यानं घेतल्या पाहिजेत. पण सरकार त्याकडे पाहत नाही. कुणीही आंदोलन केलं तो सरकार त्या विरोधात मनात राग धरणारे, लोकशाही न मानणारे आहेत, असा समज पसरलला जातो, असं म्हणत जयंत पाटलांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.