AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी कुठल्या पक्षाची प्रवक्ता नाही, पण OBC आरक्षण गरजेचं, ते टिकवणं राज्यांच्या हातात, खासदार प्रीतम मुंडेंचं लोकसभेत वक्तव्य

ओबीसी आरक्षणासंदर्भातली आकडेवारी केंद्र सरकार दाखवत नाही, असा राज्य सरकारनं वारंवार आरोप करणं चुकीचं आहे. कारण स्वातंत्र्यानंतर कधीही ओबीसी जनगणना कधीही जाहीर झालेली नाही. तरीही राज्यात ओबीसी आरक्षण टिकून होतं, असं वक्तव्य खासदार प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत केलं.

मी कुठल्या पक्षाची प्रवक्ता नाही, पण OBC आरक्षण गरजेचं, ते टिकवणं राज्यांच्या हातात, खासदार प्रीतम मुंडेंचं लोकसभेत वक्तव्य
खासदार प्रीतम मुंडे यांचं लोकसभेत वक्तव्य
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 3:51 PM
Share

नवी दिल्लीः ओबीसी समाजाचे आरक्षण (OBC Reservation) टिकवून ठेवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. याकरिता वारंवार केंद्र सरकारकडे बोटं दाखवण्याची गरज नाही, असा टोला खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी लोकसभेत (Loksabha) लगावला. मी कोणत्याही पक्षाची प्रवक्ता नाही, मात्र आरक्षण टिकवणं हे राज्याच्या हाती आहे, असं मत त्यांनी मांडलं. काल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court ) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण प्रदान करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या अध्यदेशास स्थगिती दिली.

मी कोणत्याही पक्षाची प्रवक्ता म्हणून बोलत नाही…

ओबीसी आरक्षणासंदर्भातली आकडेवारी केंद्र सरकार दाखवत नाही, असा राज्य सरकारनं वारंवार आरोप करणं चुकीचं आहे. कारण स्वातंत्र्यानंतर कधीही ओबीसी जनगणना कधीही जाहीर झालेली नाही. तरीही राज्यात ओबीसी आरक्षण टिकून होतं. त्यावेळी ते का टिकून होतं, याचा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की, राज्यकर्त्यांची मानसिकता ही मोठी भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यसरकारनं हा मुद्दा उचलून धरणं आणि ते आरक्षण टिकवणं ही काळाची गरज आहे. मी कुठल्या पक्षाची प्रवक्ता म्हणून बोलत नाहीये तर जे लाखो लोक आम्हाला इथं निवडून पाठवतात, त्यांच्या ओबीसी आरक्षणावर कुणीही घाला घालणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असं वक्तव्य प्रीतम मुंडे यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय ?

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्दीयांना 27 टक्के आरक्षण प्रदान करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. आरक्षण देण्यासाठी आधी आयोगाची स्थापना करणे आणि त्यानंतर मनपानिहाय माहिती गोळा करणे ही दोन पावले या प्रक्रियेत उचलणे आवश्यक आहे. आपल्या राजकीय अपरिहार्यतेपोटी न्यायालयाचा निकाल मागे घेतला जाऊ शकत नाही. माहिती मिळेपर्यंत वाट पाहणे आवश्यक होते, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणाऱ्या अध्यादेशाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

इतर बातम्या-

Ankita Patil | हर्षवर्धन पाटील लेकीसह ‘शिवतीर्थ’वर, अंकिता पाटलांची राज ठाकरेंशी भेट

Gopichand Padalkar: बैलगाडी शर्यतीसाठी पुन्हा मैदानात उतरुन सरकारची पळता भुई थोडी करु, गोपीचंद पडळकरांचा इशारा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.